शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

'नैसर्गिक आपत्तीतही ग्राहकांना सुरळीत वीज मिळणार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 12:04 IST

'तौक्ते' व 'निसर्ग' नैसर्गिक चक्रीवादळाप्रसंगी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या भागातील विद्युत जाळे अधिकाधिक सक्षम करणे आवश्यक असल्यानेच भूमिगत प्रकल्पाला गती देण्यात आली आहे.

रत्नागिरी : चक्रीवादळे, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीवेळीही भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पामुळे वीज ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठा मिळेल, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण २ अंतर्गत रत्नागिरी शहरामध्ये ११ के.व्ही. कर्ला उच्चदाब उपरी विद्युत वाहिनी मार्गाचे भूमिगत विद्युत वाहिनीत रूपांतरण कामाच्या ऑनलाइन लोकार्पण सोहळ्यात ऊर्जामंत्री डॉ. राऊत बोलत होते.यावेळी महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता विजय भटकर, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, प्रभारी अधीक्षक अभियंता नितीन पळसुलेदेसाई उपस्थित होते.ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मनोगत व्यक्त करताना समुद्र किनारपट्टीच्या भागात खाऱ्या हवामानामुळे वीज वाहिन्या गंजतात. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वीज तारा तुटणे, वीज खांब उन्मळून पडणे अशा घटना घडतात. वीज ग्राहकांच्या सेवेवर परिणाम होतो. भूमिगत विद्युत वाहिनी प्रकल्पामुळे या भागातील महावितरणचेही नुकसान टळेल व वीज ग्राहकांना सुरळीत वीज सेवा मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम गतीने करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.'तौक्ते' व 'निसर्ग' नैसर्गिक चक्रीवादळाप्रसंगी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर या भागातील विद्युत जाळे अधिकाधिक सक्षम करणे आवश्यक असल्यानेच भूमिगत प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. आपत्तीप्रसंगी महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या कामाचे ऊर्जामंत्री राऊत यांनी कौतुकही केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNitin Rautनितीन राऊतelectricityवीज