शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

चिपळुणात ‘साहेबां’चा गट पुढे, ‘दादां’चा गट शांतच; राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

By संदीप बांद्रे | Updated: August 14, 2023 18:05 IST

सद्यस्थितीत अजित पवार गटाची संपूर्ण जबाबदारी आमदार शेखर निकम यांच्यावर

संदीप बांद्रेचिपळूण : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर पक्षात पडलेल्या फुटीमुळे कार्यकर्ता आजही संभ्रमावस्थेत आहे. त्याउलट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गट सक्रिय झाला असून, पदाधिकारी निवडीलाही सुरुवात केली आहे. मात्र, अजित पवार गटात तालुका कार्यकारिणीसह अन्य पदांबाबतही तितकीच अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे ‘साहेबां’चा गट एक पाऊल पुढे असून, ‘दादां’च्या गटात अजूनही शांतताच आहे.सद्यस्थितीत अजित पवार गटाची संपूर्ण जबाबदारी आमदार शेखर निकम यांच्यावर पडली आहे. त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा वर्ग माेठा असल्याने पक्ष बांधणी करताना कार्यकर्त्यांची मने जपणे आव्हान ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेनंतर माजी आमदार रमेश कदम यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊन शरद पवार यांना पाठिंबा दिला. जुने जाणते कार्यकर्ते या मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा त्यांना जोडले गेले. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी मुराद अडरेकर यांची नेमणूक करत तालुका कार्यकारिणी निवडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे हा गट सक्रियही झाला आहे.अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदार निकम यांनी सावर्डे येथे कार्यकर्ता मेळावा घेतला. त्यानंतर चिपळूण शहरातील पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीनंतर आमदार निकम हे पावसाळी अधिवेशनात गुंतून गेले. या कालावधीत अजित पवार गटाकडून कार्यकारिणीबाबत कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. सद्य:स्थितीत अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे खेडच्या बाबाजी जाधव यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमावस्थेतच आहेत.

तालुकाध्यक्ष पद रिक्तच

अजित पवार यांचे समर्थक माजी तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांना पक्षात बढती दिल्याने तालुकाध्यक्ष पद रिक्त आहे. या पदासह तालुका कार्यकारिणीही निश्चित झालेली नाही. आतापर्यंत तालुकाध्यक्ष पदासाठी रमेश राणे, बाबू साळवी, नितीन ठसाळे आदींची नावे शर्यतीत आहेत. मात्र, याविषयी अद्याप पक्षीयस्तरावर कोणताही निर्णय झालेला नाही.

गेल्या काही महिन्यांत पक्षांतर्गत घडामोडीमुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातून हळूहळू प्रत्येक जण बाहेर पडत आहे. आगामी काळात तालुका कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्षाचे काम जोरदारपणे सुरू केले जाईल. जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी त्याची तयारी सुरू केली आहे. त्याप्रमाणे येत्या आठ-दहा दिवसात तालुकाध्यक्षांच्या निवडी होतील. - शेखर निकम, आमदार, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार