शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मिऱ्या - नागपूर महामार्गाचा मोबदला केवळ आठ गावांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:31 IST

highway, road, land, ratnagirinews रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन गेलेल्या रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांमधील २७ गावांपैकी आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यातील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील केवळ दोन गावांच्या मोबदल्याची रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित गावांचा मोबदला अद्याप रखडलेलाच आहे.

ठळक मुद्देमिऱ्या - नागपूर महामार्गाचा मोबदला केवळ आठ गावांनाराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला उर्वरित गावांचा अद्याप विसर

शोभना कांबळेरत्नागिरी : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन गेलेल्या रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांमधील २७ गावांपैकी आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यातील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील केवळ दोन गावांच्या मोबदल्याची रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित गावांचा मोबदला अद्याप रखडलेलाच आहे.रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी संगमेश्वर तालुक्यातील १३ गावांमधील एकूण १३,३६,८३७ चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्यातील १४ गावांमधील ६,५२,२२० चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. रत्नागिरीतील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील दहा अशा एकूण १६ गावांतील जमीनमालकांच्या मोबदला निवाड्यांची एकूण रक्कम ३१४ कोटी १३ लाख २१ हजार इतकी आहे.दोन्ही तालुक्यातील या निवाड्यांचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे २०१७ साली पाठविण्यात आला होता. मात्र, तब्बल तीन वर्षानंतर म्हणजेच, फेब्रुवारी २०२० मध्ये केवळ रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या निवाड्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रूपये प्राधिकरणाकडून येथील उपविभागीय कार्यालयाकडे फेब्रुवारी अखेर प्राप्त झाली. तसेच संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव आणि ओझरे या दोन गावांमधील खातेदारांसाठी ६ कोटी ६३ कोटी एवढ्या मोबदल्याची रक्कम मार्च महिन्यात आली आहे. त्याचे वाटप सुरू आहे.मुळात तीन वर्षानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली असून, केवळ आठ गावांच्या निवाड्याचा निधी देण्यात आला आहे. उर्वरित १९ गावांना अजूनही मोबदल्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या भूधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. केवळ आठ गावांचा निधी तीन वर्षानंतर आला. उर्वरित गावांच्या मोबदला रकमेसाठी प्राधिकरण अजून किती काळ प्रतीक्षा करायला लावणार, अशी प्रतिक्रिया या खातेदारांकडून व्यक्त होत आहे.रक्कम प्रशासनाकडेआतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा आणि पानवल या सहा गावांसाठी ६९ कोटी २० लाख ७२ हजार इतकी मोबदल्याची रक्कम शासनाकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील केवळ साखरपा आणि ओझरे या दोन गावांसाठी ६ कोटी ६३ लाख रुपये एवढीच रक्कम प्रशासनाला देण्यात आली आहे.रत्नागिरी, संगमेश्वरातील जमिनी संपादितसंगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, करंजारी, जंगलवाडी, दाभोळे, दाभोळे खुर्द, मेढेतर्फ देवळे, कोंडगाव, साखरपा, साखरपा खुर्द, दखिण, निनावे, ओझरे, मुर्शी या १३ गावांमधील तसेच रत्नागिरी तालुक्यातील झाडगाव, नाचणे, पडवेवाडी, मधलीवाडी, कुवारबाव, कारवांचीवाडी, खेडशी, पानवल, हातखंबा, बाजारपेठ, पाली, साठरे, खानू, नाणीज या १४ गावांमधील जमीन संपादित केली आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी