शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मिऱ्या - नागपूर महामार्गाचा मोबदला केवळ आठ गावांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:31 IST

highway, road, land, ratnagirinews रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन गेलेल्या रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांमधील २७ गावांपैकी आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यातील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील केवळ दोन गावांच्या मोबदल्याची रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित गावांचा मोबदला अद्याप रखडलेलाच आहे.

ठळक मुद्देमिऱ्या - नागपूर महामार्गाचा मोबदला केवळ आठ गावांनाराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला उर्वरित गावांचा अद्याप विसर

शोभना कांबळेरत्नागिरी : रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी जमीन गेलेल्या रत्नागिरी आणि संगमेश्वर तालुक्यांमधील २७ गावांपैकी आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यातील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील केवळ दोन गावांच्या मोबदल्याची रक्कम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित गावांचा मोबदला अद्याप रखडलेलाच आहे.रत्नागिरी - कोल्हापूर - नागपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनासाठी संगमेश्वर तालुक्यातील १३ गावांमधील एकूण १३,३६,८३७ चौरस मीटर आणि रत्नागिरी तालुक्यातील १४ गावांमधील ६,५२,२२० चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. रत्नागिरीतील सहा आणि संगमेश्वर तालुक्यातील दहा अशा एकूण १६ गावांतील जमीनमालकांच्या मोबदला निवाड्यांची एकूण रक्कम ३१४ कोटी १३ लाख २१ हजार इतकी आहे.दोन्ही तालुक्यातील या निवाड्यांचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे २०१७ साली पाठविण्यात आला होता. मात्र, तब्बल तीन वर्षानंतर म्हणजेच, फेब्रुवारी २०२० मध्ये केवळ रत्नागिरी तालुक्यातील सहा गावांच्या निवाड्याची रक्कम ६९ कोटी १३ लाख ११ हजार १६४ रूपये प्राधिकरणाकडून येथील उपविभागीय कार्यालयाकडे फेब्रुवारी अखेर प्राप्त झाली. तसेच संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव आणि ओझरे या दोन गावांमधील खातेदारांसाठी ६ कोटी ६३ कोटी एवढ्या मोबदल्याची रक्कम मार्च महिन्यात आली आहे. त्याचे वाटप सुरू आहे.मुळात तीन वर्षानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली असून, केवळ आठ गावांच्या निवाड्याचा निधी देण्यात आला आहे. उर्वरित १९ गावांना अजूनही मोबदल्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे या भूधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. केवळ आठ गावांचा निधी तीन वर्षानंतर आला. उर्वरित गावांच्या मोबदला रकमेसाठी प्राधिकरण अजून किती काळ प्रतीक्षा करायला लावणार, अशी प्रतिक्रिया या खातेदारांकडून व्यक्त होत आहे.रक्कम प्रशासनाकडेआतापर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून रत्नागिरी तालुक्यातील पाली, पाली बाजारपेठ, साठरे, खानू, हातखंबा आणि पानवल या सहा गावांसाठी ६९ कोटी २० लाख ७२ हजार इतकी मोबदल्याची रक्कम शासनाकडून देण्यात आली आहे. त्याचबरोबर संगमेश्वर तालुक्यातील केवळ साखरपा आणि ओझरे या दोन गावांसाठी ६ कोटी ६३ लाख रुपये एवढीच रक्कम प्रशासनाला देण्यात आली आहे.रत्नागिरी, संगमेश्वरातील जमिनी संपादितसंगमेश्वर तालुक्यातील चोरवणे, करंजारी, जंगलवाडी, दाभोळे, दाभोळे खुर्द, मेढेतर्फ देवळे, कोंडगाव, साखरपा, साखरपा खुर्द, दखिण, निनावे, ओझरे, मुर्शी या १३ गावांमधील तसेच रत्नागिरी तालुक्यातील झाडगाव, नाचणे, पडवेवाडी, मधलीवाडी, कुवारबाव, कारवांचीवाडी, खेडशी, पानवल, हातखंबा, बाजारपेठ, पाली, साठरे, खानू, नाणीज या १४ गावांमधील जमीन संपादित केली आहे.

टॅग्स :highwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी