शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

हेच जेवण त्यांच्यासाठी शेवटचे ठरले...जेवणासाठी आले अन् पाण्याने गिळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 14:00 IST

चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मित्राकडे जेवणाचा बेत आखण्यात आला. या जेवणासाठी जीवलग मित्र एकत्र आले. सर्वजण एकत्र येणार म्हणून सगळ्यांमध्येच आनंद होता. पण, नियतीला हे मान्य नव्हते आणि तिवरे धरण फुटले आणि जेवणासाठी मित्राच्या घरी आलेले हे जीवलग

ठळक मुद्देतिवरे आणि पोफळी हे अंतर केवळ ३० किलोमीटरचेच आहे

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील मित्राकडे जेवणाचा बेत आखण्यात आला. या जेवणासाठी जीवलग मित्र एकत्र आले. सर्वजण एकत्र येणार म्हणून सगळ्यांमध्येच आनंद होता. पण, नियतीला हे मान्य नव्हते आणि तिवरे धरण फुटले आणि जेवणासाठी मित्राच्या घरी आलेले हे जीवलग मित्रदेखील धरणाच्या पाण्याबरोबर वाहून गेले. या जीवलग मित्रांच्या आठवणीने आजही त्यांच्या सगे सोयºयांच्या डोळ्यात अश्रूचे बांध उभे राहतात.

सुनील पवार, रणजित काजवे, राकेश घाणेकर (तिघेही राहणार पोफळी) आणि सुमित निकम (रा. कोंडफणसवणे) अशी या चौघांची नावे आहेत. या चौघांच्या मैत्रीचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.

तिवरे येथे मंगळवारी रात्री धरण फुटलं आणि हाहाकार माजला. या दुर्घटनेत अनेकांवर काळाने घाला घातला. काळाच्या या जबड्यातून पोफळी आणि कोंडफणसवणेतील चार जीवलग मित्र सुद्धा सुटले नाहीत. तिवरेगावातील मित्राकडे जेवणाच्या निमित्ताने हे तिथं गेले आणि या धरणाच्या पाण्यात या सर्वांना काळाच्यापडद्या आड नेलं. नियती एखाद्याला आपल्या कवेत कसं घेते याचं हे उदाहरण...

तिवरे आणि पोफळी हे अंतर केवळ ३० किलोमीटरचेच आहे. सुनील पवार याचा मित्र चव्हाण याच्या तिवरे इथल्या घरी जेवणाचा बेत आखण्यात आला होता. त्यानिमित्ताने  सुनील पवार, रंजित, राकेश आणि सुमित हे चौघे या तिवरे धरणाला लागून असलेल्या घरी गेले होते. जेवणाच्या निमित्ताने सारे मित्र एकत्र येणार याचा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर होता. पण हेच जेवण त्यांच्यासाठी शेवटचे जेवण ठरले.

 

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी