शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

प्रकल्प समर्थकांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 16:21 IST

nanar refinery project Ratnagiri- आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा आहे, असे म्हणून आपली बाजू मांडण्यासाठी काही लोकांना मुख्यमंत्र्यांची भेट हवी आहे. मात्र बराच प्रयत्न करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचेच रहिवासी असलेल्या लोकांना भेटणे टाळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे लोक या लोकांना दलाल म्हणून त्यांची हेटाळणी करत आहेत. त्यांना जोड्याने मारा, अशी खुलेआम भाषणेही करत आहेत.

ठळक मुद्देप्रकल्प समर्थकांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळच नाहीआम्ही परग्रहावरून आलो आहेत का

मनोज मुळ्येरत्नागिरी : आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा आहे, असे म्हणून आपली बाजू मांडण्यासाठी काही लोकांना मुख्यमंत्र्यांची भेट हवी आहे. मात्र बराच प्रयत्न करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचेच रहिवासी असलेल्या लोकांना भेटणे टाळत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचे लोक या लोकांना दलाल म्हणून त्यांची हेटाळणी करत आहेत. त्यांना जोड्याने मारा, अशी खुलेआम भाषणेही करत आहेत.आम्हाला प्रकल्प हवाय, आम्हाला रोजगार हवाय असे म्हणणाऱ्या लोकांना मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही. आम्ही परग्रहावरून आलो आहेत का, असा प्रश्न आता प्रकल्पाचे समर्थन करणारे लोक विचारत आहेत.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २०१९ साली शिवसेनेने भाजपवर दबाव आणून रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय पदरात पाडून घेतला. या निर्णयाच्या आधीपासूनच या भागात प्रकल्प हवा आहे, असे म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली होती. निवडणुकीच्या प्रचाराआधी महाराष्ट्रभर फिरणारे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आम्हाला प्रकल्प हवा, असे फलकही झळकले होते.

जुलै २०१९ मध्ये रत्नागिरीत रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा मोर्चा काढला गेला. त्यानंतर प्रकल्प हवा आहे, असे म्हणणाऱ्यांना एकत्र करणे सुरू झाले आणि प्रकल्पासाठी प्रत्यक्ष संमत्तिपत्र घेण्याला सुरुवात झाली.जे प्रस्तावित प्रकल्प परिसरातील स्थानिक ग्रामस्थच आहेत, अशा लोकांची साडेआठ हजार एकर जमिनीची संमत्तिपत्रे तयार आहेत. हीच बाब मुख्यमंत्र्यांना सांगायची आहे. आम्हाला नोकऱ्या हव्या आहेत आणि त्यासाठी हा प्रकल्प आम्हाला हवा आहे, असे सांगण्यासाठी या लोकांना मुख्यमंत्र्यांची भेट हवी आहे. त्यासाठी वारंवार प्रयत्न करून झाले आहेत. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्यासाठी कोणत्याही लोकप्रतिनिधीने प्रयत्न केलेले नाहीत.सुनील तटकरे यांची पुन्हा भेटरिफायनरीचे समर्थन करणाऱ्यांना एकत्र आणणारी रत्नागिरीतील फार्ड संघटना आणि राजापुरातील समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रायगडमध्ये जाऊन खासदार सुनील तटकरे यांची पुन्हा भेट घेतली. त्यांच्या विनंतीला मान देऊनच रत्नागिरीतील उपोषण मागे घेण्यात आले होते.

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदाार शरद पवार यांच्याशी भेट घालून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी ॲड. शशिकांत सुतार, ॲड. कावतकर, पंढरीनाथ आंबेरकर, केशव भट, टी. जी. शेट्ये, राकेश नलावडे यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते.पालकमंत्र्यांची उपोषणकर्त्यांकडे पाठचजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणारे पालकमंत्री अनिल परब जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेल्या रिफायनरी समर्थकांकडे पाठ फिरवूनच निघून गेले. मुख्यमंत्री अख्ख्या महाराष्ट्राचे आहेत, ते कोणालाही भेटतील, असे विधान त्यांनी पत्रकारांसमोर केले असले तरी उपोषणकर्त्यांना भेटण्याचे सौजन्य मात्र त्यांनी दाखवले नाही आणि आपण पालक असलेल्या जिल्ह्यातील लोकांना मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्यात स्वारस्यही दाखवले नाही. त्यामुळे शिवसेनेला फक्त विरोधकांची बाजूच कळते, बाकीच्यांचा आवाज ऐकू येत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.प्रक्रिया अजून सुरूचकोणीही पुढाकार घेत नाही म्हणून अखेर १३ जानेवारीला प्रकल्प समर्थन समन्वय समितीने मुख्यमंत्री कार्यालयाकडे ई-मेलने पत्र पाठवून भेटीसाठी वेळ मागितली. १३ जानेवारीच्या या पत्रावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून अजून काहीही उत्तर आलेले नाही. याबाबत त्या कार्यालयात दूरध्वनीवरून चौकशी करणाऱ्यांना प्रक्रिया सुरू आहे एवढेच उत्तर दिले जात आहे.अजून वेळ होत नाहीमुख्यमंत्र्यांची भेट मिळावी म्हणून रिफायनरी समर्थकांनी २६ जानेवारीला रत्नागिरीत उपोषण केले गेले. मात्र अजूनही मुख्यमंत्र्यांना या लोकांना भेटण्यासाठी वेळ मिळालेला नाही. मुख्यमंत्र्यांना आपल्याच राज्यातील लोकांना वेळ द्यावासा वाटत नाही, ही खंत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पUddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरी