शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

स्वच्छता अभियान ठरले केवळ देखावा

By admin | Published: June 04, 2015 11:23 PM

वाजले की बारा : काही महिन्यातच उडाला मोहीमेचा फज्जा...

देवरूख : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा संगमेश्वर तालुक्यात पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे हे स्वच्छता अभियान म्हणजे केवळ देखावा ठरल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांमधून ऐकू येऊ लागली आहे.देशात संपूर्ण बहुमत प्राप्त करून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची सूत्र हाती घेतल्यावर काही काळातच स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला होता. स्वत: हातात झाडू घेऊन मोदी रस्त्यावर उतरल्याने याची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. झालेही तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती यांच्याबरोबरीने नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालये, सर्व पोलीस ठाणे आदी शासकीय खात्यांनी या मोहिमेत उडी घेतली. जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर या स्वच्छता अभियानाचे नियोजन करून त्या - त्या विभागाकडे याची जबाबादारी देण्यात आली होती. यातून सुमारे दोन महिने तरी गावोगावी स्वच्छतेचा नारा ऐकू येत होता. शालेय विद्यार्थ्यांनाही यामध्ये सहभागी करून घेत लोकसहभागातून हे मिशन स्वच्छता अभियान यशस्वी होण्याची चिन्हे होती. दोन - तीन महिने चालू असलेला स्वच्छतेचा डंका अचानक बंद झाला, शासकीय खातेप्रमुखांसह लोकप्रतिनिधींनीही यातून अंग काढून घेतले आणि मग हेच का ते स्वच्छ कार्यालय अशी विचारणा करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.या अभियानातून तहसील कार्यालय, पंचायत समिती आवार, गावागावातील ग्रामपंचायतींचा परिसर, आरोग्य केंद्र, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानके, बाजारपेठा अशा ठिकाणी राबवलेली स्वच्छता मोहीम आजघडीला केवळ कागदोपत्री राहिल्याचे दिसत आहे. तीन - चार महिन्यांनंतर हे अभियान कधी राबवले होते, असे विचारण्याची वेळ आता सर्वांवर आली आहे. या अस्वच्छतेला जबाबदार कोणाला धरणार व धरल्यास कारवाई काय, असा सवाल विचारला जात आहे. देवरूखमध्ये अनेक ठिकाणी या अभियानाचे आता बारा वाजले असल्याचे पाहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)देवरूख शहरात स्वच्छता अभियान मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. मात्र, काही कालावधीनंतर या परिसरातच कमालीची अस्वच्छता निर्माण झाल्याने याच परिसरात ही मोहीम राबविण्यात आली होती काय, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. केवळ कागदोपत्री ही मोहीम राबवू नये, असा प्रयत्न होणे आवश्यक आहे.