शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मातीचे नाग विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 4:35 AM

दर्शनासाठी भाविक रांगेत रत्नागिरी : श्रावणातील पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील विविध शिव मंदिरात नामसप्ताहास प्रारंभ झाला आहे. कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे ...

दर्शनासाठी भाविक रांगेत

रत्नागिरी : श्रावणातील पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील विविध शिव मंदिरात नामसप्ताहास प्रारंभ झाला आहे. कोरोनामुळे शासकीय नियमावलीचे पालन करण्यात येत असून भाविक सोशल डिस्टन्सिंग ठेवून दर्शनासाठी रांगा लावत आहेत. मास्क वापरणे सक्तीचे असून, सॅनिटायझरचा वापर केला जात आहे.

महागाईचा फटका

रत्नागिरी : इंधन दरात होणाऱ्या सातत्यपूर्ण वाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवास महागाईची झळ बसणार आहे. बाप्पाच्या मूर्तीसाठी लागणारे साहित्य, मजुरीचे दर वाढल्याने दरवर्षी ५ ते १० टक्क्यांनी होणारी वाढ यावर्षी २० टक्क्यांवर पोहोचली आहे.

विद्या आठवलेंचे यश

रत्नागिरी : अखिल भारतीय शिक्षक साहित्य, कला-क्रीडा मंडळ कोकण विभाग आयोजित राज्यस्तरीय काव्यगायन स्पर्धेत लांजा न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेजच्या साहाय्यक शिक्षिका विद्या आठवले यांनी द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्यांचे यशाबद्दल काैतुक करण्यात येत आहे.

खासगी वाहतुकीचा पर्याय

राजापूर : राजापूर आगारातून लांब पल्ल्याच्या कोल्हापूर, सांगली, पुणे गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी ग्रामीण भागातील बसेस मात्र भारमानाअभावी बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांना खासगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागत आहे.

पूरग्रस्तांची आरोग्य तपासणी

चिपळूण : येथील काॅंग्रेस पक्ष व मुंबई काॅंग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. पूरग्रस्तांच्या आरोग्य सुरक्षेसाठी तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत २५० पूरग्रस्तांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.

नाैका बांधणी केंद्राची मागणी

रत्नागिरी : गुजरात व तामिळनाडू राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात खोल समुद्रात मासेमारी करू शकणाऱ्या आधुनिक स्टील नाैका बांधणी केंद्र रत्नागिरीत व्हावी, अशी मागणी येथील मच्छीमारांनी केली आहे. केंद्र शासनाच्या या योजनेची अंमलबजावणी राज्यात होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

आंदोलनाचा इशारा

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांच्या कोरोना चाचणीचा वैद्यकीय अहवाल उशिरा प्राप्त होत आहे. वेळेवर अहवाल प्राप्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रूपेश कदत यांनी दिला आहे.

सायबर कॅफेत गर्दी

रत्नागिरी : सध्या आयटीआयसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिवाय डीएड पास शिक्षकांना नोकरीसाठी टीईटी परीक्षा द्यावी लागत असल्याने सायबर कॅफेत अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी गर्दी करीत आहेत. गर्दी टाळण्यासाठी अर्ज भरणाऱ्या अर्जदारांना घ्यावी लागत आहे.

फळांना मागणी

रत्नागिरी : श्रावण सुरू असल्याने भाविक उपवास करीत आहेत. उपवासाला शक्यतो फलाहार केला जात असल्याने फळांना विशेष मागणी होत आहे. केळी, सफरचंद, माेसंबी, पपई, सीताफळ, अननस, पेर, चिकू, पेरू बाजारात उपलब्ध असून, दर मात्र कडाकडले आहेत.