शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
2
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
3
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
4
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
5
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
6
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
7
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
8
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
9
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
10
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
11
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
12
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
13
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
14
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
15
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
16
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
18
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
19
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी संकटामुळे चिपळूणला महाप्रलयाचा वेढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

यावर्षी जूनमध्ये पडलेल्या पावसाने काहीशी निराशा केली. जुलैच्या पंधरवड्यापर्यंत पावसाने म्हणावी तशी हजेरी न लावल्याने प्रतीक्षा करावी लागली. मात्र, ...

यावर्षी जूनमध्ये पडलेल्या पावसाने काहीशी निराशा केली. जुलैच्या पंधरवड्यापर्यंत पावसाने म्हणावी तशी हजेरी न लावल्याने प्रतीक्षा करावी लागली. मात्र, १५ जुलैपासून पावसाने हजेरी लावली तीच जोरदार. जिल्ह्यात पावसाचे दमदार आगमन झाले. बळीराजाची रखडलेली शेतीची कामे आता मार्गी लागणार म्हणून तो खुश झाला. काही दिवसच झाले. हवामान खात्याने २० ते २२ जुलै या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची अतिवृष्टी काही ठिकाणी होण्याचा अंदाज व्यक्त केला आणि यावेळी तो अचूक ठरला. बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, रात्री अचानक जोर वाढला. कमी वेळात पावसाचे तांडव जणू सुरू झाले. चिपळूणला याचा तडाखा अधिक बसला. जणूकाही ढगफुटीसारखा पाऊस पडू लागल्याने चिपळूण आणि परिसरात पाणी भरू लागले.

समुद्र जवळ असल्याने पूर आला तरी त्याचा निचरा कमी वेळेत होतो. खाड्या आणि नद्यांमधून पाणी समुद्राला मिळते आणि पुराचे पाणी काही तासातच ओसरते. मात्र, बुुधवारी रात्री अतिमुसळधार पाऊस सुरू झाला. त्यातच पहाटे ३ वाजता भरती सुरु झाली. त्यामुळे खाड्यांमधून पाणी वाहून जाण्याऐवजी पाणी आत येऊ लागले. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास वाव मिळाला नाही आणि बहुतांश भागाला पुराच्या पाण्याने दणका दिला. गुरूवारी परिस्थिती भीषण झाली. चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदी, खेडमध्ये जगबुडी नदी, रत्नागिरी तालुक्यात सोमेश्वरची खाडी, काजळी नदी यांचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. मात्र, भरतीमुळे पावसाचे पाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या सर्व ठिकाणी पूर आला. त्यातच कोळकेवाडी धरण पूर्णपणे वाहू लागले. भेगा पडू लागल्याने फुटण्याचा धोकाही होता. त्यामुळे त्यातून विसर्ग करणे गरजेचे होते. त्यामुळे तो विसर्गही वाशिष्ठी नदीत सुरू झाला. त्यामुळे तर वाशिष्ठी नदीचे रूपही भयावह झाले.

यावर्षीच्या पावसाने २००५चा उच्चांक मागे टाकला. कोयना येथे ६१० मिलिमीटर, नवजा येथे ७४६, महाबळेश्वर ५३५ आणि चिपळूण परिसरात ६०० मिलिमीटर पाऊस झाला. कोयना, नवजा आणि महाबळेश्वर येथे पाऊस पडला की, हे पाणी चिपळूणमध्ये जाते. त्यामुळे गुरूवारी चिपळूणमध्ये महाभयंकर स्थिती निर्माण झाली. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना महापूर आले आणि सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.

बुधवारी रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने धुमाकूळ घातला, भरतीचे पाणी आणि कोळकेवाडी धरण भरल्याने करावा लागणारा विसर्ग यामुळे चिपळूणला या तिहेरी संकटाचा सामना झेलत महापुराला सामोरे जावे लागले. त्यातच वाशिष्ठी नदीच्या नवीन पुलावर सुरू असलेल्या पिलरच्या बांधकामामुळे पाण्याला अडथळा निर्माण झाला. त्यामुळे पहिल्यांदाच मुंबई - गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने वाहतूक ठप्प झाली. चिपळूण शहर आणि परिसराला या तिहेरी कारणामुळे महाप्रलयाचा सामना करावा लागला.