शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणला यंदा पुन्हा महापुराचा धोका?, वाशिष्ठी, शिव नदीतील हजारो घनमीटर गाळ नदीकाठावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 18:24 IST

हजारो घनमीटर गाळ हा प्रत्येक ठिकाणी किनाऱ्यावरच आहे. हा गाळ न उचलल्यास पावसाळ्यात शहर व परिसराला पुन्हा महापुराचा त्रास सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चिपळूण : गेल्या चार महिन्यांपासून वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ४ लाख ४५ हजार घनमीटर गाळ उपसा करण्यात आला असला तरी हजारो घनमीटर गाळ हा प्रत्येक ठिकाणी किनाऱ्यावरच आहे. हा गाळ न उचलल्यास पावसाळ्यात शहर व परिसराला पुन्हा महापुराचा त्रास सहन करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गतवर्षी आलेल्या महापुरामुळे चिपळुणात कोट्यवधींचे नुकसान झाले. अतिवृष्टी, कोयनेचे अवजल आणि समुद्राला आलेली भरती या कारणाने येथे महापूर आला. यामध्ये ९० टक्के शहर पाण्याखाली गेले. यानंतर नागरिकांमध्ये उठाव निर्माण झाला. वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ काढावा, या मागणीला जोर धरला. अखेर नागरिकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत शासनाने गाळ काढण्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर केले.

जानेवारी महिन्यापासून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, अद्याप ते पूर्ण झाले नसून पन्नास टक्केच गाळ काढण्यात आला आहे. काढलेला गाळ अनेक ठिकाण वाशिष्ठी नदीच्या काठावरच रचून ठेवलेला दिसत आहे. यामुळे अतिवृष्टीत गाळ पुन्हा नदीत पुन्हा वाहून जाणार आहे. त्यामुळे केलेल्या कामाचा उपयोग काय, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

चिपळूण बचाव समितीने बेमुदत उपोषण करून पूरप्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. केंद्रस्तरापर्यंत पाठपुरावा करण्यात आला. शासनाने गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, मात्र त्यानंतर बचाव समितीची पकड ढिली झाली आहे. या कामाचा आवश्यक तेवढा पाठपुरावा समितीकडून झाला नसल्याचे त्या कामातून पुढे येत आहे. काम ५० टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे. त्यातही वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पात्रालगत अनेक ठिकाणी गाळ किनाऱ्यावरच ठेवलेला दिसत आहे.

नाम फाउंडेशनचाही उत्साह मावळला

नाम फाउंडेशनने मोठ्या उत्साहाने शिव नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू केले. मात्र, अखेरच्या टप्प्यात त्यांचा हा उत्साह काहीसा मावळला आहे. दोन्ही कामांकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही. त्यामुळे नदीकिनारी अनेक ठिकाणी गाळ तसाच पडून आहे. तो नेण्यासाठी कोणी तयार नाही व शहर परिसरात गाळ टाकण्यासाठी जागा शिल्लक नाही, अशी कारणे सांगितली जात आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढा