शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
2
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
7
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
11
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
12
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
13
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
15
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
16
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
17
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
18
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
19
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
20
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणात १६५ गावात पशुगणनेचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:47 IST

चिपळूण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाकडून आॅनलाईन राबविण्यात येत असलेल्या पशुगणनेचे काम १६५ गावांमध्ये सुरु आहे. २०१२च्या पशुगणनेनुसार ग्रामीण भागातील कुटुंब संख्या ६६ हजार ५६३ पैकी २५ मार्चअखेर १६ हजार ८३१ कुटुंबांची गणना झाली आहे. यासाठी २५ प्रगणक काम करत आहेत.

ठळक मुद्देचिपळुणात १६५ गावात पशुगणनेचे काम सुरुपशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाकडून आॅनलाईन काम

चिपळूण : चिपळूण पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत केंद्र शासनाकडून आॅनलाईन राबविण्यात येत असलेल्या पशुगणनेचे काम १६५ गावांमध्ये सुरु आहे. २०१२च्या पशुगणनेनुसार ग्रामीण भागातील कुटुंब संख्या ६६ हजार ५६३ पैकी २५ मार्चअखेर १६ हजार ८३१ कुटुंबांची गणना झाली आहे. यासाठी २५ प्रगणक काम करत आहेत.पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती, चिपळूण केंद्र शासनामार्फत दर पाच वर्षांनी पशुगणना केली जाते. त्यानुसार तालुक्यात २०व्या पशुगणनेचे काम सुरु आहे. या पशुगणनेची मुदत दि. ३१ मार्चपर्यंत असल्याने कर्मचाऱ्यांना गणना पूर्ण करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. हे काम करण्यासाठी कर्मचारी पूर्णपणे गुंतले आहेत. कमी कालावधी असल्यामुळे ही गणना कशी पूर्ण होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या पशुगणनेसाठी तालुक्यातून २५ प्रगणक काम करत आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अतिरिक्त ताण पडत आहे. सुरुवातीला ही गणना सुशिक्षित तरुणांकडून केली जाणार होती. मात्र, त्यानंतर कर्मचाऱ्यांनाच ही गणना करण्याचे आदेश देण्यात आले. पशुसंवर्धन विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे दि. ३१ मार्चपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आव्हान आहे.पशुगणनेसाठी आॅनलाईन पद्धत अमलात आल्यानंतर त्यांच्या प्रक्रियेसाठी २०१८ हे वर्ष उजाडले आहे. आॅनलाईनसाठी टॅबचे वितरण, तर नोंदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण यामुळे प्रक्रियेला वेळ लागला. डिसेंबर २०१८पासून हे काम सुरु झाले आहे.

आज भौगोलिक परिस्थिती पाहता बराच भाग हा ग्रामीण असल्यामुळे त्या ठिकाणी आॅनलाईन पध्दतीसाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच या गणनेची माहिती ग्रामीण भागात म्हणावी तशी पोहोचली नसल्याने या पशुगणनेची नोंदी करताना कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या पशुगणनेचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :GovernmentसरकारRatnagiriरत्नागिरी