शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

चिखलगाव ग्रामपंचायतीने वाटले ७०० किलो भातबियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST

राजापूर : कोराेना महामारीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देताना, चिखलगाव ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायत फंडातून ५० टक्के अनुदानावर ...

राजापूर : कोराेना महामारीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देताना, चिखलगाव ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायत फंडातून ५० टक्के अनुदानावर ग्रामस्थांना विविध प्रकारचे सुमारे ७०० किलो भातबियाणे उपलब्ध करून दिले आहे. त्याचे वाटप करण्यात आले.

शासनाकडून ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या ग्राम फंडाचा कसा योग्य विनियोग करता येतो, ते चिखलगाव ग्रामपंचायतीने दाखवून दिले आहे. पावसाळी हंगामाला सुरुवात होत आहे, तर कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे सुरू असलेले लॉकडाऊन वाढत आहे, त्याचा परिणाम आपल्या शेतकऱ्यांना होऊ नये, म्हणून चिखलगाव ग्रामपंचायतीने चांगली योजना गावासाठी राबविली. शासनाकडून मिळालेल्या ग्रामपंचायत फंडातून आपल्या ग्रामस्थांसाठी सुमारे ७०० किलो विविध प्रकारची भातबियाणे पन्नास टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली आहेत. त्याचा शुभारंभ सरपंच अंजली अनिल जड्यार, उपसरपंच योगेश नकाशे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सुर्वे, संघमित्रा बेतकर, अनिता ठिक, भिकाजी कुडकर, रुणजी पळसमकर, माजी सरपंच तुकाराम कुडकर, ग्रामसेविका घुमे व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वप्रथम शेतकऱ्यांकडून भातबियाण्यांचे अर्ज मागविण्यात आले. त्यानंतर, ग्रामपंचायतीने घरोघरी जाऊन ते अर्ज गोळा केले आणि नंतर भातबियाण्यांचे वाटप करण्यात आले.