शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

मुख्यमंत्री प्रकल्प समर्थकांना लवकरच भेटतील, पालकमंत्री अनिल परब यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2021 21:23 IST

Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे हे सर्वाचीच बाजू ऐकून घेतील. नाणार रिफायनरी समर्थकांनाही लवकच ते भेटी देतील. भेटीची प्रक्रिया सुरु आहे. त्यांना लवकरच कळवले जाईल

राजापूर  - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे हे सर्वाचीच बाजू ऐकून घेतील. नाणार रिफायनरी समर्थकांनाही लवकच ते भेटी देतील. भेटीची प्रक्रिया सुरु आहे. त्यांना लवकरच कळवले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यानी आपल्या राजापूर भेटी दरम्यान केले. मंगळवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेडरेशन अॉफ असोसिएशन्स फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंट (फार्ड)च्या वतीने मुख्यमंत्र्याची भेट मिळावी, म्हणून उपोषण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. 

फडणवीस सरकारच्या काळात या प्रकल्पाला विरोध करत शिवसेनेने आम्ही जनतेच्या बाजूने म्हणत या रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाची जमीन अधिग्रहणाची अधिसू्चना रद्द करून घेतली होती. त्यानंतर राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. सद्यस्थितीत नाणार रिफायनरी प्रकल्पाला असणारा विरोध मोठ्या प्रमाणावर कमी झाला असून समर्थन वाढते आहे. आम्हाला नाणार  प्रकल्प हवा आहे, मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यानी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी प्रकल्प समर्थकांनी केली आहे. आमची बाजू मांडण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा, अशी मागणी गेले वर्षभर प्रकल्प समर्थकांनी लावून धरली आहे. स्थानिक आमदार व या भागाचे खासदार ती भेट घडवून देत नाहीत. प्रकल्प विरोधकांना मात्र मुख्यमंत्री लगेच भेट देतात, असा आरोप प्रकल्प समर्थकांकडून करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करूनही मुख्यमंत्री प्रकल्प समर्थकाना भेट देत नसल्याने ही भेट मिळण्यासाठी फार्डच्यावतीने मंगळवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर राजापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री अनिल परब यांना पत्रकारांनी 'मुख्यमंत्री समर्थकांची बाजू ऐकून घेणार आहेत का ?' असा प्रश्न विचारला. नाणार प्रश्नी जो काय निर्णय घ्यायचा आहे तो शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच घेतील.  प्रकल्प समर्थकांनी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे.  त्यावर प्रक्रिया सुरु असून मुख्यमंत्री म्हणून ते त्यांची बाजू नक्कीच ऐकून घेतील, असे मंत्री परब यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Anil Parabअनिल परबRatnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण