शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

नाणार पुन्हा आणणार मुख्यमंत्र्यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 11:43 PM

राजापूर : शिवसेनेने युतीसाठी घातलेल्या अटीमुळे भाजपला रद्द कराव्या लागलेल्या रिफायनरी प्रकल्प पुन्हा नाणार येथेच आणण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र ...

राजापूर : शिवसेनेने युतीसाठी घातलेल्या अटीमुळे भाजपला रद्द कराव्या लागलेल्या रिफायनरी प्रकल्प पुन्हा नाणार येथेच आणण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राजापुरात दिले. प्रकल्पाला समर्थन करणाऱ्यांचा उत्साह पाहता नाणार रिफायनरी प्रकल्पाबद्दल पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. आज यावर काहीही भाष्य करता येणार नाही. मला पुन्हा बोलवा, असे मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेप्रसंगी राजापूर येथे जाहीर केले.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाणार प्रकल्पावरूनच शिवसेना-भाजपमधील युती ताणली गेली होती. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी केलेले हे विधान शिवसेनेला इशाराच मानला जात आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाजनादेश यात्रा राजापुरात आली. महामार्गावर एस. टी. आगारासमोरच त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. आम्हाला प्रकल्प हवा आहे, असा फलक घेतलेले असंख्य समर्थक तेथे मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. त्यांनी प्रकल्प हवा असल्याच्या घोषणा दिल्या. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘नाणार रिफायनरीसंदर्भात पुन्हा चर्चा करायला काहीच हरकत नाही. रिफायनरीमुळे कोकणात १ लाख रोजगार उपलब्ध होतील. मी अगोदरपासूनच रिफायनरी नाणारला व्हावी असे घसा फोडून सांगत होतो. मात्र आता तुमचा उत्साह पाहून समाधान वाटतं,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा राजापूरात सुमारे दोन तास उशिराने पोहोचली. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री विनोद तावडे,आमदार प्रसाद लाड, आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्याचे स्वागत करण्यासाठी भाजपचे राजापूर तालुकाध्यक्ष अभिजीत गुरव यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत रत्नागिरी जिल्ह्याच्या वेशीवरुन म्हणजेच टाकेवाडी येथून बाईक रॅलीने करण्यात आले. राजापूर एस. टी. आगारासमोर मंडप घालण्यात आला होता, मात्र उशीर झाल्याने मुख्यमंत्र्यानी आपल्या रथावरुनच उपस्थितांशी संवाद साधला. महाजनादेश यात्रेनिमित्त मी आपले आशीर्वाद घ्यायला आलो आहे. आमच्या भाजपा आघाडी सरकारने पाच वर्षात अनेक कामे केली आहेत त्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी आलो आहे. तुमचे आशिर्वाद असेच कायम पाठीशी राहुदे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.काय म्हणाले मुख्यमंत्री...‘‘अगोदरपासूनच मी रिफायनरी नाणारला व्हावी म्हणून आग्रही होतो. ही ग्रीन रिफायनरी आहे. यातून कोकणातील तरुणांना एक लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे मी घसा फोडून सांगत होतो. त्यावेळी झालेला विरोध पाहून आम्हाला रिफायनरी रद्द करावी लागली होती . मात्र आता मी कोणताही निर्णय जाहीर करत नसलो तरी नाणारला रिफायनरी होण्यासाठी चर्चा होऊ शकते. तुमचा हा उत्साह पाहून समाधान वाटते.’’