शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी मुख्य अभियंते ‘फिल्ड’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 4:28 AM

रत्नागिरी : अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे चिपळूण येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा ...

रत्नागिरी : अतिवृष्टी आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे चिपळूण येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद करावा लागला होता. चिपळूण येथे वीज पुरवठा करणाऱ्या तीन उपकेंद्रांतून १६ वाहिन्यांद्वारे वीज पुरवठा देण्यात येतो. यापैकी एका उपकेंद्रात पूर परिस्थितीला उतार आल्यानंतर चार फिडरद्वारे वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर व महावितरणची सर्व टीम त्यासाठी धडपडत आहे.

चिपळूण शहर व परिसरातील ३६ गावात पूर आला होता. त्यापैकी पाच गावातील वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. अद्याप १,१३५ ट्रान्सफॉर्मरपैकी केवळ ३४६ ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यात येऊन ५०,९७५ वीज जोडण्यांपैकी १६,३०३ वीज जोडण्या पुन्हा सुरू करणे शक्य झाले आहे.

अनेक ठिकाणी प्रत्यक्ष वीज मीटर, ट्रान्सफॉर्मर चिखल आणि गाळाने भरून गेले आहेत. याठिकाणी वीज प्रवाह धोकादायक ठरू शकतो, यासाठी खबरदारी घेण्यात येत असतानाच वीज पुरवठा सुरू केलेला नाही. मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर हे स्वत: चिपळूण येथे पूरस्थळी कार्यरत झाले आहेत. त्यामुळे उर्वरित दोन्ही उपकेंद्र सुरू करणे, उर्वरित ग्राहकांचा वीज पुरवठा सुरू करणे याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येत आहे.

चिपळूण येथील वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधन सामुग्री तातडीने उपलब्ध करण्यात आले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा कोकण प्रादेशिक कार्यालय येथील प्रभारी प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे घेत आहेत. चिपळूण तसेच पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील विद्युत पुरवठा लवकरच पूर्वपदावर येईल, असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.