शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

बारामतीचा स्वस्त कांदा विक्रीसाठी रत्नागिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 13:01 IST

बहुतांश खाद्य पदार्थांमध्ये आवश्यक असणारा कांदा १५० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले. मात्र, रत्नागिरीच्या बाजारपेठेत बारामतीचा कांदा ५० ते ७० रुपये दराने मिळू लागल्याने अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

ठळक मुद्देबारामतीचा स्वस्त कांदा विक्रीसाठी रत्नागिरीतआचारसंहितेमुळे उठवले

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : बहुतांश खाद्य पदार्थांमध्ये आवश्यक असणारा कांदा १५० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले. मात्र, रत्नागिरीच्या बाजारपेठेत बारामतीचा कांदा ५० ते ७० रुपये दराने मिळू लागल्याने अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.यावर्षी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला कांदा शेतात सडून गेल्याने नवीन कांदा बाजारात येतच नसल्याने आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. काही शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सध्या बाजारात येत आहे. घाऊक बाजारात कांद्याने क्विंटलला दहा हजाराचा टप्पा ओलांडल्याने किरकोळ बाजारात हाच कांदा १५० रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. हॉटेल आणि उपाहारगृहात कांदा काटकसरीने वापरला जात आहे.रत्नागिरीत गेल्या २ दिवसांपासून कुवारबाव ते आठवडा बाजार परिसरात कांदा विक्री करणाऱ्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्यांवर मिळणारा कांदा ५० ते ७० रुपये दराने विकला जात होता. लहान आकाराचा कांदा ५० रुपये, मध्यम आकाराचा ६० रुपये तर मोठा कांदा ७० रुपयाने होता. ५० रुपये प्रतिकिलो दराने १० किलोची पोती विक्रीला ठेवली होती, तर किरकोळही कांदा दिला जात होता. कमी दरात कांदा उपलब्ध झाल्याचे कळताच अनेकांनी कांदा खरेदीसाठी गर्दी केली होती.रत्नागिरीत विक्रीसाठी आलेला हा कांदा बारामती येथील असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तेथून कांदा सातारा येथील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो. स्वस्त दरामुळे हा कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली होती. रत्नागिरी शहराप्रमाणेच कुवारबाव येथेही कांदा विक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला.आचारसंहितेमुळे उठवलेकांदा विक्री करणाऱ्या गाड्या शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषद कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. नगर परिषद कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच ते तेथे दाखल झाले. नगर परिषदेची निवडणूक आहे, आचारसंहिता आहे तुम्हाला गाड्या लावता येणार नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर हे विक्रेते तिथून निघून गेले.लोणंद समिती प्रसिद्धराज्यात सातारा जिल्ह्यातील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यांमधील कांदा विक्रीसाठी येतो. तसेच पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील कांदाही लोणंदमध्येच विक्रीसाठी आणला जातो. 

टॅग्स :onionकांदाRatnagiriरत्नागिरी