शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

बारामतीचा स्वस्त कांदा विक्रीसाठी रत्नागिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 13:01 IST

बहुतांश खाद्य पदार्थांमध्ये आवश्यक असणारा कांदा १५० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले. मात्र, रत्नागिरीच्या बाजारपेठेत बारामतीचा कांदा ५० ते ७० रुपये दराने मिळू लागल्याने अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.

ठळक मुद्देबारामतीचा स्वस्त कांदा विक्रीसाठी रत्नागिरीतआचारसंहितेमुळे उठवले

अरुण आडिवरेकर रत्नागिरी : बहुतांश खाद्य पदार्थांमध्ये आवश्यक असणारा कांदा १५० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणले. मात्र, रत्नागिरीच्या बाजारपेठेत बारामतीचा कांदा ५० ते ७० रुपये दराने मिळू लागल्याने अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती.यावर्षी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला कांदा शेतात सडून गेल्याने नवीन कांदा बाजारात येतच नसल्याने आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. काही शेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सध्या बाजारात येत आहे. घाऊक बाजारात कांद्याने क्विंटलला दहा हजाराचा टप्पा ओलांडल्याने किरकोळ बाजारात हाच कांदा १५० रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. हॉटेल आणि उपाहारगृहात कांदा काटकसरीने वापरला जात आहे.रत्नागिरीत गेल्या २ दिवसांपासून कुवारबाव ते आठवडा बाजार परिसरात कांदा विक्री करणाऱ्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्यांवर मिळणारा कांदा ५० ते ७० रुपये दराने विकला जात होता. लहान आकाराचा कांदा ५० रुपये, मध्यम आकाराचा ६० रुपये तर मोठा कांदा ७० रुपयाने होता. ५० रुपये प्रतिकिलो दराने १० किलोची पोती विक्रीला ठेवली होती, तर किरकोळही कांदा दिला जात होता. कमी दरात कांदा उपलब्ध झाल्याचे कळताच अनेकांनी कांदा खरेदीसाठी गर्दी केली होती.रत्नागिरीत विक्रीसाठी आलेला हा कांदा बारामती येथील असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तेथून कांदा सातारा येथील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो. स्वस्त दरामुळे हा कांदा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी झुंबड उडाली होती. रत्नागिरी शहराप्रमाणेच कुवारबाव येथेही कांदा विक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला.आचारसंहितेमुळे उठवलेकांदा विक्री करणाऱ्या गाड्या शुक्रवारी सकाळी जिल्हा परिषद कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर उभ्या केल्या होत्या. नगर परिषद कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच ते तेथे दाखल झाले. नगर परिषदेची निवडणूक आहे, आचारसंहिता आहे तुम्हाला गाड्या लावता येणार नाहीत, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर हे विक्रेते तिथून निघून गेले.लोणंद समिती प्रसिद्धराज्यात सातारा जिल्ह्यातील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्यासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यांमधील कांदा विक्रीसाठी येतो. तसेच पुणे जिल्ह्यातील भोर, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील कांदाही लोणंदमध्येच विक्रीसाठी आणला जातो. 

टॅग्स :onionकांदाRatnagiriरत्नागिरी