शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

Parshuram Ghat: परशुराम घाट बंदच्या वेळेत बदल, चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 18:12 IST

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामात वाहतुकीमुळे होणारे अडथळे दूर करण्यासाठी सकाळी ...

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामात वाहतुकीमुळे होणारे अडथळे दूर करण्यासाठी सकाळी ११ ते ५ या वेळेत घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता नागरिक व लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांच्या सोयीनुसार या वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आता दुपारी १२ ते सायंकाळी ६ या वेळेत वाहतुकीसाठी घाट बंद राहणार आहे.गेल्या तीन महिन्यांपासून परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, हे काम सुरू असतानाच दरड कोसळणे, रस्ता खचणे अशा घटना घडू लागल्याने या कामात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच घाटात काम सुरू असताना दगड कोसळून काही घरांचे नुकसानही झाले होते. या घटनेमुळे रस्त्याच्या खालील बाजूने संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे अवघ्या महिनाभरात सुमारे दीडशे मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात आली. अजूनही काही भागातील संरक्षक भिंतीचे काम शिल्लक आहे.मात्र, आता संबंधित कल्याण टोलवेज व ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीने रस्त्याच्या वरील बाजूस असलेल्या दरडीच्या बाजूने खोदाई सुरू केली आहे. सुमारे २३ मीटर उंच दरडीचा भाग असल्याने घाटातील हा अतिशय अवघड टप्पा मानला जात आहे. आता पावसाळ्यापूर्वी डोंगर कटाई करून तातडीने तेथेही संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी २५ हून अधिक पोकलेन, डंपर, डोजर अशी यंत्रणा कामाला लावली आहे.साधारण २५ मे पासून संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून तयारी केली जात आहे. त्यानंतर संपूर्ण जून महिना हे काम सुरू ठेवले जाणार आहे. अशातच लोटे औद्योगिक वसाहतीमधील कामगार व अन्य नागरिकांच्या सूचनेनुसार या वेळेत बदल करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत घेण्यात आला असून तसे पत्र प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिले आहे.'या' मार्गे वाहतूक मात्र ग्रामस्थ धुळीने हैराणपरशुराम घाट बंद असताना लोटे, चिरणी, कळंबस्ते या मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र, आता या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ येत असल्याने वाहतूकदारांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. तसेच स्थानिक ग्रामस्थही धुळीमुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या पर्यायी मार्गावरही चिखल व अन्य समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग विभागाने आत्तापासूनच उपाययोजना कराव्यात अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीTrafficवाहतूक कोंडी