कोळंबी संवर्धकांच्या प्रकल्पावर मत्स्यसंवर्धक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:23+5:302021-07-17T04:25:23+5:30

रत्नागिरी : डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथील मत्स्य संवर्धक विभाग व मत्स्य जलशास्त्र ...

Celebrate Fisheries Day at the Shrimp Breeders Project | कोळंबी संवर्धकांच्या प्रकल्पावर मत्स्यसंवर्धक दिन साजरा

कोळंबी संवर्धकांच्या प्रकल्पावर मत्स्यसंवर्धक दिन साजरा

रत्नागिरी : डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत मत्स्य महाविद्यालय, शिरगाव येथील मत्स्य संवर्धक विभाग व मत्स्य जलशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी मालगुंड येथे नव्याने उभारलेल्या ‘ग्लोबल ॲक्वा’ या कोळंबी शेती प्रकल्पाच्या ठिकाणी मत्स्यसंवर्धक दिन साजरा करण्यात आला.

कोळंबी संवर्धनाचे सुयोग्य व्यवस्थापन, जैव सुरक्षितता व आरोग्य व्यवस्थापन याबाबत डाॅ. सुरेश नाईक, डाॅ. अनिल पावसे, डाॅ. मिलिंद सावंत, डाॅ. गजानन घोडे, डाॅ. राजू तिबले यांनी मार्गदर्शन करून विविध विषयांवर चर्चा केली. या वेळी मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ. प्रकाश शिनगारे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रकल्पधारकास सर्वतोपरी तांत्रिक सहकार्य मत्स्य महाविद्यालयातर्फे करण्याचे आश्वासन दिले. प्रकल्पधारक समीर साळवी यांनी उभारलेल्या ‘ग्लोबल ॲक्वा’ या कोळंबी शेती प्रकल्पास भेट दिली.

डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मत्स्य संवर्धन विभाग व मत्स्य जलशास्त्र विभाग यांच्या सहकार्याने व सहयोगी अधिष्ठाता डाॅ. प्रकाश शिनगारे यांच्या प्रेरणेने मत्स्यसंवर्धक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रक़ल्पस्थळी इतर मत्स्य संवर्धक, पुरवठाधारक, तसेच कामगार उपस्थित होते.

------------------------------

मत्स्य महाविद्यालयातर्फे मालगुंड येथे नव्याने ‘ग्लोबल ॲक्वा’ या कोळंबी शेती प्रकल्पास भेट देऊन राष्ट्रीय मत्स्यसंवर्धक दिन साजरा करण्यात आला. या वेळी डाॅ. सुरेश नाईक, डाॅ. अनिल पावसे, डाॅ. मिलिंद सावंत, डाॅ. गजानन घोडे उपस्थित होते.

Web Title: Celebrate Fisheries Day at the Shrimp Breeders Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.