शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

ठाकरे सिनेमासाठी कलाकारांची निवड केली कोकणच्या सुपुत्राने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 14:29 IST

बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमधील कलाकारांची निवड करणंही तितकसं सोपं नव्हतं. पण कोकणचे सुपुत्र असलेल्या कास्टींग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी ही अवघड जबाबदारी अगदी सहज पार पाडली. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे रोहन मापुस्कर सुपुत्र आहेत. या सिनेमासाठी कलाकारांची निवड करणे खूपच कठीण होते, असे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देठाकरे सिनेमासाठी कलाकारांची निवड केली कोकणच्या सुपुत्रानेकास्टींग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी पार पाडली जबाबदारी

रत्नागिरी : बाळासाहेब ठाकरे यांच्या बायोपिकमधील कलाकारांची निवड करणंही तितकसं सोपं नव्हतं. पण कोकणचे सुपुत्र असलेल्या कास्टींग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी ही अवघड जबाबदारी अगदी सहज पार पाडली. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे रोहन मापुस्कर सुपुत्र आहेत. या सिनेमासाठी कलाकारांची निवड करणे खूपच कठीण होते, असे त्यांनी सांगितले.ठाकरे हा सिनेमा माझ्या आयुष्यातील पहिलाच बायोपिक आहे, ज्याचं कास्टींग मी करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मला या निवडीसाठी खुप अभ्यास करावा लागला. खुपसे संदर्भ तपासावे लागले. बाळासाहेबांच्या आयुष्याशी निगडीत असलेल्या घटनांचा अंदाज घ्यावा लागला. कोणता माणूस कोणत्या व्यक्तिरेखेला साजेसा राहील. या कास्टींगसाठी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषेतील कलाकारांचा विचार केला गेला होता.बायोपिकमध्ये काम करताना संबंधित व्यक्तिरेखेच्या मिस मॅच जागा कलाकाराने अभिनयाने भरून काढायच्या असतात तर मिस मॅच जागा कमीत कमी असतील असा कलाकार शोधणं हे आर्ट डायरेक्टरचं काम असतं. ठाकरेमध्येही नवाजच्या रुपाने ठाकरेसाहेबांच्या एकूणच बॉडी लॅग्वेजशी साधर्म्य असणारा कलाकार मिळाला. नवाजचं चालणं, काही हावभाव हे थेट साहेबांची आठवण करुन देणारे होते. त्यामुळेच नवाज साहेबांच्या व्यक्तिरेखेत चपखल बसला. नवाजनेही साहेबांच्या बॉडी लॅग्वेजचा अभ्यास केला. भाषणं ऐकली आणि मग अभिनय सादर केला.राज आणि उद्धव यांच्या व्यक्तिरेखेविषयी ठोस असं काही ठरवलं गेलं नव्हतं. पण दिग्ददर्शकांनी सांगितल्यानुसार मी या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाशी साधर्म्य असणारी व्यक्ती शोधत होतो. ही शोधमोहीम बरीच अवघड होती. पण या सिनेमाचं कास्टींग हातात घेतल्यानंतर असावेत म्हणून मी या दोघांच्या व्यक्तिरेखांचा रिसर्च सुरु ठेवला होता. आयत्या वेळचा गोंधळ टाळण्यासाठी केलेली ही युक्ती बरीच कामाला आली, असे त्यांनी सांगितले.ठाकरे सिनेमाच्या कास्टींगला जवळपास साडेतीन ते चार महिन्यांचा वेळ लागला. कारण या सिनेमात अनेक व्यक्तिरेखा आहेत. आनंद दिघे, दत्ता साळवी या आणि अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्ती आहेत. या सिनेमासाठी जवळपास ७० ते ८० चेहरे मॅच करावे लागले. प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ते कार्यकर्त्यांपर्यंत अनेक व्यक्तिरेखांसाठी मॅच शोधावे लागले.

या सिनेमात आनंद दिघेंची व्यक्तिरेखा माझ्या मित्रांच्या काकांनी केली आहे. म्हणजेच काही चेहरे आसपास होते तर काही जाणीवपूर्वक शोधावे लागले. गजानन कीर्तीकर यांच्या व्यक्तिरेखेचंही तसंच झालं. माझ्या बाबांच्या आणि कीर्तीकरांच्या चेहेऱ्यात असलेलं साम्य लक्षात आलं आणि माझे किराणा दुकानदार बाबा सिनेमात काम करायला तयार झाले. त्यामुळे या सिनेमात केवळ नावाजलेले अभिनेतेच नाही तर काही सामान्य माणसांमधील अभिनेतेही आहेत, असे त्यांनी सांगितले.माँसाहेबांच्या भूमिकेसाठी अमृताच का?माँसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेतल्यावर मला एकच शब्द आठवला तो म्हणजे सोज्वळ. या व्यक्तिरेखेसाठी मी अशा अभिनेत्रीच्या शोधात होतो जिच्या चेहऱ्यावर निरागस आणि सात्विक भाव असतील. मग मेक अप केलेला असो वा नसो. त्यावेळी मी अमृताचा विवाह हा सिनेमा बघत होतो. त्यातील तिचा अभिनय, हावभाव पाहूनच मी माँसाहेबांच्या भूमिकेसाठी अमृताची निवड केली.

टॅग्स :Thackeray movieठाकरे सिनेमाRatnagiriरत्नागिरीRaigadरायगड