शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

काजूच्या चिकापासून औषध निर्मिती, औषधी गुणधर्म सिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 12:38 IST

काजूच्या चिकापासून औषध निर्मिती करणे शक्य असून, सावर्डे येथील फार्मसी कॉलेजच्या भाग्यश्री चोथे हिने त्यातील औषधी गुण सिद्ध केले आहेत. या संशोधनासाठी भारत सरकारने तिला नुकतेच पेटंट प्रदान केले आहे. भाग्यश्री ही मूळची सांगली येथील असून, ती सध्या गोवा येथे एका कंपनीत सेवा बजावत आहे.

ठळक मुद्देसावर्डे फार्मसी कॉलेजच्या भाग्यश्री चोथे हिला संशोधनात यशऔषधाचा परिणाम २४ तास, काजूच्या चिकाची मागणी वाढण्याची शक्यता

चिपळूण : काजूच्या चिकापासून औषध निर्मिती करणे शक्य असून, सावर्डे येथील फार्मसी कॉलेजच्या भाग्यश्री चोथे हिने त्यातील औषधी गुण सिद्ध केले आहेत. या संशोधनासाठी भारत सरकारने तिला नुकतेच पेटंट प्रदान केले आहे. भाग्यश्री ही मूळची सांगली येथील असून, ती सध्या गोवा येथे एका कंपनीत सेवा बजावत आहे.कोकणात मोठ्या प्रमाणात काजूचे पीक घेतले जाते. हजारो हेक्टर क्षेत्र काजू लागवडीने व्यापलेले असून, त्याला आता सरकारी अनुदानातूनही तितकाच हातभार लागत आहे. त्यामुळे कोकणात काजूच्या लागवडीचे प्रमाण वाढलेले असतानाच उत्पन्नही तितक्याच पटीत शेतकरी घेत आहेत. कोकणातील काजूला तितकीच मागणी असून, अत्याधुनिक फळ प्रक्रियेमुळे येथे काजूचे नवीन उद्योगही मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहेत.तसे पाहिले तर काजूपासून काजूगर, ड्रायफूट्स म्हणून उपयोग होतो. शिवाय काजूच्या बोंडापासून मद्य तयार केले जाते. याविषयी दापोलीतील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने संशोधन केले आहे. तसेच काजूच्या बोंडापासून तयार केली जाणारी काजू फेणी हे मद्य गोव्यात तितेकच प्रसिद्ध आहे. मात्र, आता काजूच्या खोडापासून निघणाऱ्या चिकात पॉलिमर हा औषधी गुण असल्याचे भाग्यश्री चोथे हिने सिद्ध केले आहे.या औषधी गुणधर्मामुळे एखाद्या औषधाचा परिणाम २४ तास राहू शकतो, असेही या संशोधनातून पुढे आले आहे. त्यामुळे भविष्यात काजूच्या चिकाची मागणी वाढून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. या संशोधनासाठी प्रा. माया देसाई व प्रा. प्रवीण वाघचौरे यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखर निकम, सचिव अशोक विचारे, प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे यांनी अभिनंदन केले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी