शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

घराबाहेर न पडण्याचे आवाहन विनाकारण घराबाहेर पडलात तर कारवाई होणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 16:15 IST

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरी पोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर ...

ठळक मुद्दे रत्नागिरी पोलिसांचे कडक धोरणफिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना तासभर बसण्याची शिक्षा शहरातील विविध भागात कडक पोलीस बंदोबस्त

रत्नागिरी : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांविरोधात रत्नागिरीपोलिसांनी कडक धोरण स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. वाहनचालकांबरोबरच सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना एकाच जागेवर एक तास बसून ठेवण्याची शिक्षा गुरूवारी देण्यात आली होती. तर शुक्रवारी सकाळी अवघ्या एका तासात तब्बल ४४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. चर्मालय, आयसीआयसी बँक आणि उद्यमनगर येथे ही कारवाई करण्यात आली.थोडीशी शिथिलता मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर विनाकारण लोक घराबाहेर पडू लागल्याने रत्नागिरी पोलिसांनी गुरुवारी सायंकाळपासून कारवाई कठोरपणे सुरू केली. गुरुवारी वाहन घेऊन आणि मैदानावर वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. शुक्रवारी सकाळी ९.५० ते ११ या मुदतीत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या पथकाने अचानक कडक नाकाबंदी केली.चर्मालय तिठा, आयसीआयसी बँक चौक, उद्यमनगर चौक परिसर या ठिकाणी अचानक नाकाबंदी करून ४४ वाहन चालकांवर कारवाई केली. तसेच विनाकारण फिरणारे वाहने जप्ती व वाहनांवर हजारो रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. रोडवर किरकोळ कारणांकरीता फिरणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन बाहेर न फिरण्याबाबत समज दिली. अशा प्रकारची मोहीम सुरुच राहणार असून वाहन जप्ती कारवाई मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे, असे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे. पोलीस प्रशासनाने आत्तापर्यंत जवळजवळ १०० दुचाकी जप्त केल्या आहेत. तर चारचाकी वाहनेदेखील जप्त केली आहेत. ही सर्व वाहने पोलीस कवायत मैदानावर ठेवण्यात आली असून, लॉकडाऊन संपल्यानंतरच सर्व वाहने परत दिली जाणार आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणPoliceपोलिस