शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

डिझेलटंचाईमुळे रत्नागिरीत बससेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:11 IST

दिपावलीच्या सुट्ट्या असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारासाठी लागणारा डिझेल टँकरसाठी सोमवार रात्री ऊशिरा मागणी करण्यात आली. मात्र तो येण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी डिझेल संपल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण एस. टी. सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. फेऱ्या अर्धा तास उशिराच्या फरकाने धावत होत्या. मात्र, दुपारनंतर स्थिती पुन्हा पूर्ववत झाली.

ठळक मुद्देडिझेलटंचाईमुळे रत्नागिरीत बससेवा विस्कळीतदुपारनंतर स्थिती पुन्हा पूर्ववत

रत्नागिरी : दिपावलीच्या सुट्ट्या असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारासाठी लागणारा डिझेल टँकरसाठी सोमवार रात्री ऊशिरा मागणी करण्यात आली. मात्र तो येण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी डिझेल संपल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण एस. टी. सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. फेऱ्या अर्धा तास उशिराच्या फरकाने धावत होत्या. मात्र, दुपारनंतर स्थिती पुन्हा पूर्ववत झाली.दिपावलीची सुट्टी दि. ५ ते १० नोव्हेंबर अखेर असल्याने दि.१२ रोजी कार्यालये पूर्ववत सुरू झाली. बँका बंद असल्यामुळे डिझेलसाठी लागणारी रक्कम सोमवारी बँकेत जमा करण्यात आल्यानंतर ऊशिरा टँकर मागणी करण्यात आली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागीय कार्यशाळेत दररोज ५५ लाख रुपयांचे उत्पन्न जमा होते.दरमहा १८ ते २० कोटीची रक्कम असल्याने बँकेतर्फे वाहन पाठवून रक्कम रोजच्या रोज बँकेत जमा केली जाते.दुसरा व चौथा शनिवारी बँका बंद असताना रक्कम तर जमा होत असल्याने डिझेलसाठी लागणारी रक्कम वापरता येत नाही. त्यासाठीचे चलन तयार करता येत नाही.

शनिवार, रविवार जोडून सुट्टी आल्यानंतर सोमवारीच डिझेलसाठी पैसे वापरले जातात. डिझेलसाठीचे चलन तयार केल्यानंतरच कंपनीकडून टँकर पाठविले जातात. त्यामुळे सोमवारी डिझेलसाठीचे चलन भरल्यानंतर मंगळवारी दुपारी टँकराला परंतु सकाळीच डिझेल संपल्यामुळे राजापूर आगारातून डिझेल मागणविण्यात आले.

राजापूरातून डिझेल आणलेनंतर गाड्यांमध्ये भरण्यात आले. परंतु दरम्यानच्या काळात शहरी तसेच ग्रामीण भागातील फेऱ्यावर त्याचा परिणाम झाला. गाड्या ऊशिरा धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. रत्नागिरी बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.

शहरी प्रवाशी संतप्तरत्नागिरी शहरी बसवाहतुकीवरही डिझेलटंचाईचा परिणाम झाला. अनेक फेऱ्या उशिरा सुटल्याने प्रवाशी संतप्त झाले होते. दुपारी १.१५ ते १.४५ यावेळेत केवळ कारवांचीवाडी ही एकच बस सोडण्यात आली. त्यामुळे मजगावकडे जाणाऱ्या प्रवाशांनी एकच हंगामा केला. काही नागरिकांनी कारवांचीवाडी बस थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहकाने याबाबत वाहतूक नियंत्रक कक्षाशी संपर्क साधण्यास सांगून बस पुढे जाऊ दिली. विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रक कक्षात यादरम्यान कुणीच नव्हते

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी