शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलटंचाईमुळे रत्नागिरीत बससेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 17:11 IST

दिपावलीच्या सुट्ट्या असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारासाठी लागणारा डिझेल टँकरसाठी सोमवार रात्री ऊशिरा मागणी करण्यात आली. मात्र तो येण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी डिझेल संपल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण एस. टी. सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. फेऱ्या अर्धा तास उशिराच्या फरकाने धावत होत्या. मात्र, दुपारनंतर स्थिती पुन्हा पूर्ववत झाली.

ठळक मुद्देडिझेलटंचाईमुळे रत्नागिरीत बससेवा विस्कळीतदुपारनंतर स्थिती पुन्हा पूर्ववत

रत्नागिरी : दिपावलीच्या सुट्ट्या असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारासाठी लागणारा डिझेल टँकरसाठी सोमवार रात्री ऊशिरा मागणी करण्यात आली. मात्र तो येण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी डिझेल संपल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण एस. टी. सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाली होती. फेऱ्या अर्धा तास उशिराच्या फरकाने धावत होत्या. मात्र, दुपारनंतर स्थिती पुन्हा पूर्ववत झाली.दिपावलीची सुट्टी दि. ५ ते १० नोव्हेंबर अखेर असल्याने दि.१२ रोजी कार्यालये पूर्ववत सुरू झाली. बँका बंद असल्यामुळे डिझेलसाठी लागणारी रक्कम सोमवारी बँकेत जमा करण्यात आल्यानंतर ऊशिरा टँकर मागणी करण्यात आली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी विभागीय कार्यशाळेत दररोज ५५ लाख रुपयांचे उत्पन्न जमा होते.दरमहा १८ ते २० कोटीची रक्कम असल्याने बँकेतर्फे वाहन पाठवून रक्कम रोजच्या रोज बँकेत जमा केली जाते.दुसरा व चौथा शनिवारी बँका बंद असताना रक्कम तर जमा होत असल्याने डिझेलसाठी लागणारी रक्कम वापरता येत नाही. त्यासाठीचे चलन तयार करता येत नाही.

शनिवार, रविवार जोडून सुट्टी आल्यानंतर सोमवारीच डिझेलसाठी पैसे वापरले जातात. डिझेलसाठीचे चलन तयार केल्यानंतरच कंपनीकडून टँकर पाठविले जातात. त्यामुळे सोमवारी डिझेलसाठीचे चलन भरल्यानंतर मंगळवारी दुपारी टँकराला परंतु सकाळीच डिझेल संपल्यामुळे राजापूर आगारातून डिझेल मागणविण्यात आले.

राजापूरातून डिझेल आणलेनंतर गाड्यांमध्ये भरण्यात आले. परंतु दरम्यानच्या काळात शहरी तसेच ग्रामीण भागातील फेऱ्यावर त्याचा परिणाम झाला. गाड्या ऊशिरा धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. रत्नागिरी बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.

शहरी प्रवाशी संतप्तरत्नागिरी शहरी बसवाहतुकीवरही डिझेलटंचाईचा परिणाम झाला. अनेक फेऱ्या उशिरा सुटल्याने प्रवाशी संतप्त झाले होते. दुपारी १.१५ ते १.४५ यावेळेत केवळ कारवांचीवाडी ही एकच बस सोडण्यात आली. त्यामुळे मजगावकडे जाणाऱ्या प्रवाशांनी एकच हंगामा केला. काही नागरिकांनी कारवांचीवाडी बस थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहकाने याबाबत वाहतूक नियंत्रक कक्षाशी संपर्क साधण्यास सांगून बस पुढे जाऊ दिली. विशेष म्हणजे वाहतूक नियंत्रक कक्षात यादरम्यान कुणीच नव्हते

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी