शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

रत्नागिरी : देवरूखातील ब्रिटीशकालीन शाळा मोडकळीस, काम मंजूर होत नसल्याने नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 16:47 IST

संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे ब्रिटीशांनी १९१९ साली बांधलेली ही शाळा आता धोकादायक बनली आहे. मात्र, तरीही येथील विद्यार्थ्यांना या धोकादायक व गळक्या शाळेत बसण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात ही शाळा गळत असल्याने विद्यार्थ्यांना या गळक्या शाळेत बसूनच धडे गिरवावे लागतात.

ठळक मुद्दे- आरवली केंद्रशाळेला चार वर्गखोल्या मंजूर करण्याचे निर्देश - मागणी केलेल्या कामांपैकी कोणतेच काम मंजूर होत नसल्याने नाराजीचा सूर- आरवली केंद्र शाळेत शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच - शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत ग्रामस्थ

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे ब्रिटीशांनी १९१९ साली बांधलेली ही शाळा आता धोकादायक बनली आहे. मात्र, तरीही येथील विद्यार्थ्यांना या धोकादायक व गळक्या शाळेत बसण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात ही शाळा गळत असल्याने विद्यार्थ्यांना या गळक्या शाळेत बसूनच धडे गिरवावे लागतात.जिल्हा परिषद शिक्षण विभाग दरवर्षी साधारण दोन कोटी रुपये शिक्षणावर खर्च करतो. यामध्ये नवीन शाळा बांधणे, शाळा दुरुस्ती करणे आदी कामे होत असतात. मात्र, आरवली येथे मागणी करुनही वर्गखोल्या मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

आरवली केंद्र शाळेतील विद्यार्थी हे धोकादायक व गळक्या शाळेत बसत असतानादेखील प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. या शाळेची दुरुस्ती वेळेत केली गेली नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

आरवली हे मुंबई - गोवा महामार्गवरील गजबजलेले ठिकाण असून, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या नेहमीच्या मार्गावरील असलेल्या या केंद्र शाळेकडे त्यांचे का लक्ष जात नाही, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.

पहिली ते सातवीपर्यंत असणाऱ्या येथील केंद्र शाळेत ६७ मुली आणि ६७ मुले अशी एकूण १३४ पटसंख्या आहे. परंतु, येथील विद्यार्थ्यांना दररोज भीतीच्या सावटाखालीच अभ्यास करावा लागत आहे.शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील शाळांना शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी किचन शेडचे वितरण करण्यात आले. मात्र, आरवली शाळेला किचनशेड दिलेली नाही.

किचनशेड वितरणाची जबाबदारी ही ठेकेदारावर असताना किचनशेड का देण्यात आली नाही, याची चौकशी तालुका शिक्षणाधिकाऱ्यांनी का केली नाही, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तर चालू आर्थिक वर्षात शाळेला संरक्षक भिंत बांधून मिळावी, अशीही मागणी केली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळा