शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

रत्नागिरी : देवरूखातील ब्रिटीशकालीन शाळा मोडकळीस, काम मंजूर होत नसल्याने नाराजीचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 16:47 IST

संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे ब्रिटीशांनी १९१९ साली बांधलेली ही शाळा आता धोकादायक बनली आहे. मात्र, तरीही येथील विद्यार्थ्यांना या धोकादायक व गळक्या शाळेत बसण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात ही शाळा गळत असल्याने विद्यार्थ्यांना या गळक्या शाळेत बसूनच धडे गिरवावे लागतात.

ठळक मुद्दे- आरवली केंद्रशाळेला चार वर्गखोल्या मंजूर करण्याचे निर्देश - मागणी केलेल्या कामांपैकी कोणतेच काम मंजूर होत नसल्याने नाराजीचा सूर- आरवली केंद्र शाळेत शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच - शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत ग्रामस्थ

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सध्या अखेरच्या घटका मोजत आहे ब्रिटीशांनी १९१९ साली बांधलेली ही शाळा आता धोकादायक बनली आहे. मात्र, तरीही येथील विद्यार्थ्यांना या धोकादायक व गळक्या शाळेत बसण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात ही शाळा गळत असल्याने विद्यार्थ्यांना या गळक्या शाळेत बसूनच धडे गिरवावे लागतात.जिल्हा परिषद शिक्षण विभाग दरवर्षी साधारण दोन कोटी रुपये शिक्षणावर खर्च करतो. यामध्ये नवीन शाळा बांधणे, शाळा दुरुस्ती करणे आदी कामे होत असतात. मात्र, आरवली येथे मागणी करुनही वर्गखोल्या मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.

आरवली केंद्र शाळेतील विद्यार्थी हे धोकादायक व गळक्या शाळेत बसत असतानादेखील प्रशासन त्याकडे डोळेझाक करत आहे. या शाळेची दुरुस्ती वेळेत केली गेली नाही तर विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

आरवली हे मुंबई - गोवा महामार्गवरील गजबजलेले ठिकाण असून, प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या नेहमीच्या मार्गावरील असलेल्या या केंद्र शाळेकडे त्यांचे का लक्ष जात नाही, हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.

पहिली ते सातवीपर्यंत असणाऱ्या येथील केंद्र शाळेत ६७ मुली आणि ६७ मुले अशी एकूण १३४ पटसंख्या आहे. परंतु, येथील विद्यार्थ्यांना दररोज भीतीच्या सावटाखालीच अभ्यास करावा लागत आहे.शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील शाळांना शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी किचन शेडचे वितरण करण्यात आले. मात्र, आरवली शाळेला किचनशेड दिलेली नाही.

किचनशेड वितरणाची जबाबदारी ही ठेकेदारावर असताना किचनशेड का देण्यात आली नाही, याची चौकशी तालुका शिक्षणाधिकाऱ्यांनी का केली नाही, असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. तर चालू आर्थिक वर्षात शाळेला संरक्षक भिंत बांधून मिळावी, अशीही मागणी केली होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळा