शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
3
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
4
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
5
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
6
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
7
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
8
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
9
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
10
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
11
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
12
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
13
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
14
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजना ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. शेत पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासाच्या आत विमा कंपनीला माहिती देणे गरजेचे आहे. त्यासाठी सहा पर्याय उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमेतंर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत क्राॅप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकांवर माहिती देणे आवश्यक आहे. जेणेकरून विमा कंपन्यांना याची दखल घेणे भाग पडणार असून शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकेल.

ग्रामपंचायत, कृषी कार्यालयाकडून दखल

नुकसान झाल्यास ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे माहिती देण्यात येत असे. प्रशासकीय पातळीवरून नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यामार्फत नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून अहवाल शासनाकडे, विमा कंपनीकडे पाठविला जात असे.

तालुका, जिल्हा कृषी कार्यालयाकडेही नुकसानाची माहिती देण्यात येत असे. कृषी विभागाकडून याची दखल घेऊन तातडीने पंचनामा आटोपला जात असे. शिवाय विमा कंपन्याकडे नुकसानाचा अहवाल सादर केला जात असे.

आता आहेत नवीन

सहा पर्याय

क्राॅप इन्शुरन्स ॲपवर पिकाच्या नुकसानाची माहिती देणे बंधनकारक आहे.

विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकाचा अवलंब करता येतो.

ज्या बॅंकेतून विमा हप्त्याची रक्कम भरली आहे, त्या बँकेला नुकसानाची कल्पना द्यावी.

मंडल कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाकडे नुकसान झाल्याचे कळवावे.

शासनाच्या महसूल विभागाकडेही नुकसानाची माहिती देता येते.

लेखी स्वरूपात विमा कंपनीच्या तालुका किंवा जिल्हा कार्यालयात नुकसानबाबत तक्रार करता येते. सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र कळविणे बंधनकारक आहे.

अतिवृष्टीने दोन

कोटींचे नुकसान

जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २,१०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. महापुराचे पाणी, चिखल भात खाचरात शिरल्यामुळे पिकांचे दोन कोटीचे नुकसान झाले आहे. पीक विमा योजनेतंर्गत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत कळविणे गरजेचे आहे. त्यासाठी सहा विविध पर्याय उपलब्ध केले असून शेतकऱ्यांनी योग्य पर्यायाचा अवलंब करणे गरजेचे आहे. जेणेकरून नुकसानीची तातडीने दखल घेणे सोपे हाईल.

- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी.