शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजना ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. शेत पिकाचे नुकसान झाल्यास ७२ तासाच्या आत विमा कंपनीला माहिती देणे गरजेचे आहे. त्यासाठी सहा पर्याय उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखीमेतंर्गत विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत क्राॅप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकांवर माहिती देणे आवश्यक आहे. जेणेकरून विमा कंपन्यांना याची दखल घेणे भाग पडणार असून शेतकऱ्यांना भरपाई मिळू शकेल.

ग्रामपंचायत, कृषी कार्यालयाकडून दखल

नुकसान झाल्यास ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे माहिती देण्यात येत असे. प्रशासकीय पातळीवरून नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यामार्फत नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून अहवाल शासनाकडे, विमा कंपनीकडे पाठविला जात असे.

तालुका, जिल्हा कृषी कार्यालयाकडेही नुकसानाची माहिती देण्यात येत असे. कृषी विभागाकडून याची दखल घेऊन तातडीने पंचनामा आटोपला जात असे. शिवाय विमा कंपन्याकडे नुकसानाचा अहवाल सादर केला जात असे.

आता आहेत नवीन

सहा पर्याय

क्राॅप इन्शुरन्स ॲपवर पिकाच्या नुकसानाची माहिती देणे बंधनकारक आहे.

विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकाचा अवलंब करता येतो.

ज्या बॅंकेतून विमा हप्त्याची रक्कम भरली आहे, त्या बँकेला नुकसानाची कल्पना द्यावी.

मंडल कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयाकडे नुकसान झाल्याचे कळवावे.

शासनाच्या महसूल विभागाकडेही नुकसानाची माहिती देता येते.

लेखी स्वरूपात विमा कंपनीच्या तालुका किंवा जिल्हा कार्यालयात नुकसानबाबत तक्रार करता येते. सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र कळविणे बंधनकारक आहे.

अतिवृष्टीने दोन

कोटींचे नुकसान

जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २,१०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. महापुराचे पाणी, चिखल भात खाचरात शिरल्यामुळे पिकांचे दोन कोटीचे नुकसान झाले आहे. पीक विमा योजनेतंर्गत बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत कळविणे गरजेचे आहे. त्यासाठी सहा विविध पर्याय उपलब्ध केले असून शेतकऱ्यांनी योग्य पर्यायाचा अवलंब करणे गरजेचे आहे. जेणेकरून नुकसानीची तातडीने दखल घेणे सोपे हाईल.

- विनोद हेगडे, तालुका कृषी अधिकारी, रत्नागिरी.