शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
3
"गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
4
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
5
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
6
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
7
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
8
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
9
२०२५ची सांगता एकदशीने: २०२६मध्ये किती एकादशी? २ अधिक व्रतांची भर; पाहा, आषाढी-कार्तिकी तिथी
10
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
11
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
12
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
13
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
14
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
15
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
16
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
17
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
18
बँकेची कामे वेळेत उरका! जानेवारीत १६ दिवस 'बँक हॉलिडे'; पाहा सुट्ट्यांचे संपूर्ण कॅलेंडर
19
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
20
BJP-RSSवरील दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ, काँग्रेसमध्ये पडले दोन गट; विरोधही-समर्थनही!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी न मिळाल्यास निवडणुकांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:18 IST

खटाव तालुक्यातील कलेढोण आणि परिसरातील सोळा गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी टेंभू योजनेचे पाणी विधानसभा निवडणुकीपूर्वी द्यावेच लागेल. हे पाणी या सोळा गावांना न मिळाल्यास आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय

ठळक मुद्देविखळे पाणी परिषदेत सर्वपक्षीय निर्धार : कलेढोणसह सोळा गावांना पाणी देण्याची मागणी

मायणी : खटाव तालुक्यातील कलेढोण आणि परिसरातील सोळा गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी टेंभू योजनेचे पाणी विधानसभा निवडणुकीपूर्वी द्यावेच लागेल. हे पाणी या सोळा गावांना न मिळाल्यास आगामी विधानसभेसह सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात येईल, असा ठाम निर्धार सर्वपक्षीय पाणी परिषदेत करण्यात आला.

विखळे, ता. खटाव येथील कलेढोणसह सोळा गावांना टेंभू योजनेचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी मिळावे, यासाठी सोमवारी सर्वपक्षीय मेळावा, लढा पाण्याचा, तहानलेल्या जीवांचा या घोषवाक्यासह आयोजित केला होता. या सर्वपक्षीय मेळाव्यास कलेढोणसह १६ गावांतील व आटपाडी पश्चिम उत्तर भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.टेंभू योजना सातारा जिल्ह्यातील असून, सातारा जिल्ह्यातून सांगली, सोलापूर जिल्ह्याला पाणी जात आहे. हे पाणी या दुष्काळग्रस्त भागाला आजपर्यंत मिळाले नाही. शेजारच्या तालुक्यात, जिल्ह्यात आरक्षण नसलेल्या भागात हे पाणी जात आहे. आजच्या या भागातील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी नाही, शेतीसाठी पाणी नाही, जनावरांसाठी चारा नाही, जनावरांसाठी पाणी नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे आता रडत बसण्याची वेळ नाही. रडून पाणी कोणी देणार नाही, त्यामुळे लढून पाणी मिळविण्याची वेळ आली आहे, असा निर्णय मेळाव्यात घेण्यात आला.

पाणी मिळविण्यासाठी आजपर्यंत आपण कमी पडलो आहे. १९७४ ते ७६ सालच्या लवादामध्ये ५८४ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. यातील ३० ते ३५ टीएमसी पाणी उपलब्ध आहे. यातील फक्त ३ ते ४ टीएमसी पाण्याची गरज आहे. हे पाणी खटाव तालुक्यातील या १६ व माण तालुक्यातील १६ गावांना सहज मिळू शकते. त्यामुळे शासनाकडून वर्षातून तीनवेळा देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. त्यामुळे हे आमचे हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे ते कसे द्यायचे हे आता संबंधित शासनकर्त्यांनी ठरवावे.

आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, दिलीप येळगावकर, माजी कोकण विभाग आयुक्त प्रभाकर देशमुख, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजित देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, पंचायत समिती सदस्या मेघा पुकळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य नंदकुमारे मोरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी पाणी कशाप्रकारे उपलब्ध आहे व आपल्याला कसे मिळविता येईल, याबाबत आपले मनोगत व्यक्त करून आम्ही जनतेबरोबर आहे, हे स्पष्ट केले.

परिषदेचे प्रास्ताविक विनोद देशमुख यांनी केले. तर रघुनाथ देशमुख, साईनाथ निकम, विठ्ठल काटकर, भगवान सानप, किरण जाधव, चंद्रकांत हुलगे, संजीव साळुंखे, सोमनाथ शेटे, अतुल देशमुख, सुदाम घाडगे, रघुनाथ घाडगे, सतीश काटकर, जिजाबा घुटुगडे, रमेश हिंजे, चंद्र्रकांत पावणे या ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त केले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई