शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जयगड येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 14:39 IST

मासे गरवण्यासाठी गेलेल्यांपैकी एकजण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला जयगड येथे घडली होती. या युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी तेथूनच १०० मीटरच्या परिसरात आढळून आला. वीरांची विलास खापले (१८, रा. पन्हळी, जयगड) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देजयगड येथे बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडलामासे गरवण्यासाठी गेला होता

रत्नागिरी : मासे गरवण्यासाठी गेलेल्यांपैकी एकजण बुडाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला जयगड येथे घडली होती. या युवकाचा मृतदेह सोमवारी सकाळी तेथूनच १०० मीटरच्या परिसरात आढळून आला. वीरांची विलास खापले (१८, रा. पन्हळी, जयगड) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.वीरांची हा रविवारी सकाळी आपल्या मित्रांसोबत मासे गरवण्यासाठी जयगड कासारी येथील बंधाऱ्यावर गेला होता. रविवारी समुद्राला अमावास्येची भरती होती. पाण्याचा जोर नेहमीपेक्षा अधिक होता तसेच पाण्याला करंटही होता. पाण्याची पातळीही नेहमीपेक्षा वाढली होती.मासे गरवत असताना वीरांचीचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. पाण्याच्या प्रवाहासोबत वीरांची वाहत असल्याचे लक्षात येताच मित्रांनी आरडाओरड सुरू केली. तेथीलच जवळच्या गावातील ग्रामस्थ मदतीसाठी दाखल होईपर्यंत वीरांची पाण्यात बुडाला.

या घटनेची खबर स्थानिक पोलीस पाटील आणि प्रशासनाला देण्यात आली. रविवारी रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता. सोमवारी सकाळी पुन्हा त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. तो बुडालेल्या ठिकाणापासून १०० मीटर अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी जयगड पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.भावाचे दोन वर्षापूर्वी निधनवीरांची याच्या भावाचे दोन वर्षापूर्वीच निधन झाले आहे. आता वीरांची याच्या जाण्याने खापले कुटुंबियांचा आधारच गेला आहे. एकुलत्या एक वीरांचीच्या जाण्याने खापले कुटुंबियांवर दु:खाचा जणू डोंगरच कोसळला आहे.

टॅग्स :AccidentअपघातRatnagiriरत्नागिरी