शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

खलाशांअभावी अजून नौका बंदच, परप्रांतातील खलाशी बेपत्ताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 14:12 IST

CoronaVirus, boat, ratnagirinews, Mirkarwada Bandar कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी लाखो रुपयांची रक्कम ॲडव्हान्स घेऊनही अनेक नौकांवरील खलाशी अजूनही परतलेले नाहीत. त्यामुळे नौका मालक अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देखलाशांअभावी अजून नौका बंदच, परप्रांतातील खलाशी बेपत्ताच कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी लाखो रुपयांची रक्कम ॲडव्हान्स घेऊनही अनेक नौकांवरील खलाशी अजूनही परतलेले नाहीत. त्यामुळे नौका मालक अडचणीत आले आहेत.आज मच्छिमारांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये सर्वात मोठी अडचण ही आर्थिक असली तरी आता खलाशांचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारीनंतर पर्ससीन नेटने मासेमारी करणे बंदी घालण्यात आल्याने आणि कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे किनारपट्टीवरील कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. त्याचा परिणाम इतरही संबंधित व्यवसायांवर झाला होता. खलाशांअभावी अशीच परिस्थिती राहिल्यास या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे़मासेमारी १ ऑगस्टपासून सुरु झाली असली तरी अनेक खलाशी अडीच महिने उलटले तरी ते परतलेले नाहीत. तसेच मासेमारी सुरु झाल्यानंतर वातावरणातील बदलामुळे मासेमारी बंद ठेवावी लागत आहे. अनेक नौका आज नांगरावर आहेत. लाखो रुपये ॲडव्हान्स देऊनही खलाशी न आल्याने नौका मालक अडचणीत सापडले आहेत. नौका मालकांकडे नवीन खलाशांना देण्यासाठीही पैसे नसल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे.नौकामालक अडचणीतसहा महिने खोल समुद्रातील मासेमारी ठप्प झाली होती. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या भीतीने अनेक खलाशांनी पलायनही केले होते. त्यांना दिलेला ॲडव्हान्स नौका मालकांना त्यांच्याकडून वसूल करता आलेला नसल्याने ते आर्थिक अडचणीत आले आहेत. 

टॅग्स :fishermanमच्छीमारMirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या