शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात रक्ताचा तुटवडा; केवळ ४० बॅगा शिल्लक

By शोभना कांबळे | Updated: December 15, 2023 17:42 IST

रत्नागिरी : सध्या साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यातच आता सर्वांनाच मोफत उपचार केले जात असल्याने जिल्हा शासकीय ...

रत्नागिरी : सध्या साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यातच आता सर्वांनाच मोफत उपचार केले जात असल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल होणाऱ्या विविध आजारांच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. अपघातांची संख्याही वाढल्याने जिल्हा रूग्णालयात विविध रक्तगटाचा तुटवडा जाणवू लागला आहे.

सध्या सर्दी, खोकला, तापसरी याचबरोबर डेंग्यूसारखे आजारही वाढले असल्याने गंभीर रूग्णाला जिल्हा रूग्णालयात दाखल करावे लागते. प्रसुतींची संख्या वाढली आहे, अपघातांमध्ये गंभीर होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीतून प्रसूतीसाठी येणाऱ्या माता, ज्येष्ठ नागरिक, माजी सैनिक, आर्थिक दुर्बल, हिमोफिलीया, थॅलिसिमिया सारख्या आजारग्रस्त रूग्णांना मोफत रक्त पुरवठा केला जातो. त्यामुळे या रूग्णालयाच्या रक्तपेढीची गरज वाढली आहे.

रक्तपेढीतर्फे रक्तदात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. एखाद्या रक्तगटाचा तुटवडा होताच रक्तपेढीतून रक्तदात्यांशी संपर्क केला जातो. त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही विविध ठिकाणी शिबिरे आयोजित केली जातात. मात्र, सध्या जिल्हा रूग्णालयाच्या रक्तपेढीला विविध गटाच्या रक्तांचा तुटवडा जाणवत आहे. सध्या दिवसाला २५ ते ३० पिशव्या लागत आहेत. मात्र, सध्या केवळ ४० रक्त पिशव्या शिल्लक आहेत. त्यामुळे रक्तपेढीला प्राधान्य क्रम ठरवून रक्तपिशव्यांचा पुरवठा करावा लागत आहे. विविध रक्तदाते आणि सामाजिक संस्था यांना रक्तदानासाठी सहकार्य करण्याचे आवाहन रक्तपेढीतर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBlood Bankरक्तपेढीhospitalहॉस्पिटल