शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी पुन्हा ठाकरे बंधू एकत्र; उद्धव अन् राज ठाकरे मोर्चास्थळी निघाले
2
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
3
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
4
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
5
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
7
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
8
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स
9
Mumbai Traffic Update: मनसेचा 'सत्याचा मोर्चा', मुंबईच्या वाहतुकीत बदल;  'या' भागांत रस्त्यांवर निर्बंध, पोलिसांच्या सूचना
10
Plastic Bans: महाराष्ट्राच्या शेजारी राज्याने प्लास्टिक वापराबाबत उचललं कठोर पाऊल!
11
केरळमध्ये आता कुणीही 'अत्यंत गरीब' नाही, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचा मोठा दावा
12
टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...
13
शुक्र गोचर २०२५: २ नोव्हेंबर, कार्तिकीच्या मुहूर्तावर 'मालव्य' राजयोगात ५ राशींना धन-समृद्धी योग!
14
SSC-HSC Exam Dates: महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; पहिला पेपर कधी?
15
KYC पूर्ण नसेल तर FASTag बंद होणार का; पाहा NHAI काय म्हटलं? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
17
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
18
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
19
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
20
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?

नेत्यांकडे विकासाची दृष्टी आणि निधीसाठी हट्ट हवा : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 17:27 IST

कोकणातील नद्यांचा गाळ उपसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. केवळ ९ ते १० कोटी रूपयाने भागणार नाही. ते कोणाच्या खिशात जातील तेही समजणार नाही.

चिपळूण : कोकणातील नद्यांचा गाळ उपसा केला तर पूर्वीचे वैभव पुन्हा उभे राहील आणि विकालाही गती मिळेल. मात्र, त्यासाठी कोकणच्या नेत्यांकडे विकासाची दृष्टी हवी. निधी मागण्यासाठी हट्टही करायला हवा. तरच हा प्रश्न सुटू शकतो असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले.वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी व लाल, निळी पूररेषा रद्द करण्यासाठी चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू आहे. गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणाला आज, शनिवारी प्रमोद जठार यांनी भेट देत येथील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या.प्रमोद जठार म्हणाले की, चिपळूण बचाव समितीने लोकहिताचे काम हाती घेतले आहे. हा प्रश्न तडीस गेल्यास आपोआपच अन्य प्रश्नही सुटणार आहेत. त्यामुळे हा मुद्दा शेवटपर्यंत धरून ठेवणे आवश्यक आहे. कोकणातील विकासाची उंची समुद्राच्या खोलीत लपली आहे. ती खोली गाठल्याशिवाय यश नाही. त्यासाठी कोकणच्या नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. निधी मिळवण्यासाठी हट्ट करायला हवा, तरच मिळणार आहे. अन्यथा सहजासहजी निधी मिळत नाही, हा आपला अनुभव आहे, असे ते म्हणाले.मोठ्या निधीची गरजसर्रासपणे कोकणचा माणूस कोणाकडे मदत मागत नाही किंवा मदतीची प्रतीक्षा करत बसत नाही. आलेल्या परिस्थितीला तोंड देणे हेच कोकणी माणसाला माहिती आहे. परंतु, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. केवळ ९ ते १० कोटी रूपयाने भागणार नाही. ते कोणाच्या खिशात जातील तेही समजणार नाही. आपल्याला या प्रश्नी कोणतेही राजकारण करायचे नाही किंवा त्यासाठी आलेलो नाही, असे जठार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक विजय चितळे, निशिकांत भोजने, शहराध्यक्ष आशिष खातू उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाriverनदीStrikeसंप