शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

नेत्यांकडे विकासाची दृष्टी आणि निधीसाठी हट्ट हवा : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2021 17:27 IST

कोकणातील नद्यांचा गाळ उपसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. केवळ ९ ते १० कोटी रूपयाने भागणार नाही. ते कोणाच्या खिशात जातील तेही समजणार नाही.

चिपळूण : कोकणातील नद्यांचा गाळ उपसा केला तर पूर्वीचे वैभव पुन्हा उभे राहील आणि विकालाही गती मिळेल. मात्र, त्यासाठी कोकणच्या नेत्यांकडे विकासाची दृष्टी हवी. निधी मागण्यासाठी हट्टही करायला हवा. तरच हा प्रश्न सुटू शकतो असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सरचिटणीस व माजी आमदार प्रमोद जठार यांनी केले.वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा करण्यासाठी व लाल, निळी पूररेषा रद्द करण्यासाठी चिपळूण बचाव समितीच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू आहे. गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणाला आज, शनिवारी प्रमोद जठार यांनी भेट देत येथील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या.प्रमोद जठार म्हणाले की, चिपळूण बचाव समितीने लोकहिताचे काम हाती घेतले आहे. हा प्रश्न तडीस गेल्यास आपोआपच अन्य प्रश्नही सुटणार आहेत. त्यामुळे हा मुद्दा शेवटपर्यंत धरून ठेवणे आवश्यक आहे. कोकणातील विकासाची उंची समुद्राच्या खोलीत लपली आहे. ती खोली गाठल्याशिवाय यश नाही. त्यासाठी कोकणच्या नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. निधी मिळवण्यासाठी हट्ट करायला हवा, तरच मिळणार आहे. अन्यथा सहजासहजी निधी मिळत नाही, हा आपला अनुभव आहे, असे ते म्हणाले.मोठ्या निधीची गरजसर्रासपणे कोकणचा माणूस कोणाकडे मदत मागत नाही किंवा मदतीची प्रतीक्षा करत बसत नाही. आलेल्या परिस्थितीला तोंड देणे हेच कोकणी माणसाला माहिती आहे. परंतु, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. केवळ ९ ते १० कोटी रूपयाने भागणार नाही. ते कोणाच्या खिशात जातील तेही समजणार नाही. आपल्याला या प्रश्नी कोणतेही राजकारण करायचे नाही किंवा त्यासाठी आलेलो नाही, असे जठार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या सोबत नगरसेवक विजय चितळे, निशिकांत भोजने, शहराध्यक्ष आशिष खातू उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाriverनदीStrikeसंप