शहरं
Join us  
Trending Stories
1
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
2
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
3
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
4
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
5
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
6
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
7
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
8
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
9
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
10
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
11
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
12
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
13
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
14
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
15
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
16
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
17
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
18
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
19
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
20
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत

भाजपने जिल्हा शिवसेनेला सोडला?,असंतोषाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:01 IST

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपची युती सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झालेली नव्हती. मात्र, युती होण्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांना उमेदवारीचे ए. बी. फॉर्म रविवारीच दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा भाजपने शिवसेनेलाच सोडला काय, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्दे गुहागरच्या जागेवर हक्क सांगणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीवर पाणीवादग्रस्त जागांमध्ये जिल्ह्यातील एकाही जागेचा समावेश नाही

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपची युती सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झालेली नव्हती. मात्र, युती होण्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांना उमेदवारीचे ए. बी. फॉर्म रविवारीच दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा भाजपने शिवसेनेलाच सोडला काय, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.शिवसेना व भाजपच्या युतीबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. सोमवारी भाजप उमेदवारांच्या अंतिम यादीसाठी नवी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी उशिरापर्यंत बैठक सुरू हाती. त्यावेळी केवळ चार जागांवरून अजूनही सेना व भाजपमध्ये तडजोड होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या चारही वादग्रस्त जागांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही जागेचा समावेश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ भाजपने जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांवर उमेदवारी नको म्हणत तुळशीपत्र ठेवले असून, हा जिल्हाच सेनेला देऊन टाकल्याची चर्चा रंगली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली - खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी - संगमेश्वर, लांजा - राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांची काही वर्षांपूर्वीची युतीमधील वाटणी ही गुहागर, रत्नागिरी मतदारसंघ भाजपला व उर्वरित मतदारसंघ शिवसेनेला अशी होती. मात्र, आता ती स्थिती राहिलेली नाही. २०१४मध्ये राष्ट्रवादीतून सेनेत दाखल होऊन रत्नागिरी मतदारसंघात आमदार उदय सामंत स्थिरावले आहेत. त्यामुळे रत्नागिरीची जागा सेनेला सोडण्याची तयारी भाजपने ठेवलेलीच होती. परंतु गुहागरची जागा मात्र सोडणार नाही, अशी भाजपची प्रथमपासूनची ठाम भूमिका होती. भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड व अन्य नेत्यांनीही ही भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली होती.मात्र, शिवसेनेने जिल्ह्यातील पाचही जागांवर आपल्या उमेदवारांना ए. बी. फॉर्म दिल्यानंतरही भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजपला सेनेचा निर्णय मान्य आहे, असा अर्थ त्यातून काढला जात आहे. भाजपची मागणी असलेली जिल्ह्यातील गुहागरची जागाही सेनेला देण्यास भाजप नेतृत्त्वाने खरोखर मान्यता दिली आहे का, असा सवालही या निमित्ताने विचारला जात आहे. ह्यसबकुछ शिवसेनाह्ण हे सूत्र जिल्ह्यातील भाजपला मान्य होईल की वादंग सुरू होतील, याचीही चर्चा आहे.सबकुछ शिवसेना मुळे बंडखोरी होणार?जिल्ह्यात भाजप विधानसभेच्या एकाही जागेवर लढणार नाही, हे पाहता भाजप जिल्ह्यात अस्तित्वहीन होण्याची भीती जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. तलवार म्यान करूनच राहायचे तर त्याचा पक्षाला काय फायदा, असा सवालही केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते सेनेला मनापासून मदत करतील का, गुहागरमध्ये बंडखोरीची शक्यता आहे का, या चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी