शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

भाजपने जिल्हा शिवसेनेला सोडला?,असंतोषाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 16:01 IST

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपची युती सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झालेली नव्हती. मात्र, युती होण्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांना उमेदवारीचे ए. बी. फॉर्म रविवारीच दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा भाजपने शिवसेनेलाच सोडला काय, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्दे गुहागरच्या जागेवर हक्क सांगणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीवर पाणीवादग्रस्त जागांमध्ये जिल्ह्यातील एकाही जागेचा समावेश नाही

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपची युती सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झालेली नव्हती. मात्र, युती होण्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांना उमेदवारीचे ए. बी. फॉर्म रविवारीच दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा भाजपने शिवसेनेलाच सोडला काय, याबाबत जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.शिवसेना व भाजपच्या युतीबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. सोमवारी भाजप उमेदवारांच्या अंतिम यादीसाठी नवी दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सायंकाळी उशिरापर्यंत बैठक सुरू हाती. त्यावेळी केवळ चार जागांवरून अजूनही सेना व भाजपमध्ये तडजोड होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या चारही वादग्रस्त जागांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एकाही जागेचा समावेश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ भाजपने जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांवर उमेदवारी नको म्हणत तुळशीपत्र ठेवले असून, हा जिल्हाच सेनेला देऊन टाकल्याची चर्चा रंगली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली - खेड, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी - संगमेश्वर, लांजा - राजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांची काही वर्षांपूर्वीची युतीमधील वाटणी ही गुहागर, रत्नागिरी मतदारसंघ भाजपला व उर्वरित मतदारसंघ शिवसेनेला अशी होती. मात्र, आता ती स्थिती राहिलेली नाही. २०१४मध्ये राष्ट्रवादीतून सेनेत दाखल होऊन रत्नागिरी मतदारसंघात आमदार उदय सामंत स्थिरावले आहेत. त्यामुळे रत्नागिरीची जागा सेनेला सोडण्याची तयारी भाजपने ठेवलेलीच होती. परंतु गुहागरची जागा मात्र सोडणार नाही, अशी भाजपची प्रथमपासूनची ठाम भूमिका होती. भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड व अन्य नेत्यांनीही ही भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली होती.मात्र, शिवसेनेने जिल्ह्यातील पाचही जागांवर आपल्या उमेदवारांना ए. बी. फॉर्म दिल्यानंतरही भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे भाजपला सेनेचा निर्णय मान्य आहे, असा अर्थ त्यातून काढला जात आहे. भाजपची मागणी असलेली जिल्ह्यातील गुहागरची जागाही सेनेला देण्यास भाजप नेतृत्त्वाने खरोखर मान्यता दिली आहे का, असा सवालही या निमित्ताने विचारला जात आहे. ह्यसबकुछ शिवसेनाह्ण हे सूत्र जिल्ह्यातील भाजपला मान्य होईल की वादंग सुरू होतील, याचीही चर्चा आहे.सबकुछ शिवसेना मुळे बंडखोरी होणार?जिल्ह्यात भाजप विधानसभेच्या एकाही जागेवर लढणार नाही, हे पाहता भाजप जिल्ह्यात अस्तित्वहीन होण्याची भीती जिल्ह्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. तलवार म्यान करूनच राहायचे तर त्याचा पक्षाला काय फायदा, असा सवालही केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते सेनेला मनापासून मदत करतील का, गुहागरमध्ये बंडखोरीची शक्यता आहे का, या चर्चेला उधाण आले आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRatnagiriरत्नागिरी