शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
3
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
4
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
5
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
6
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
7
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
8
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
9
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
10
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
11
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
12
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
13
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
14
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
15
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
16
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
17
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
18
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
19
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
20
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!

भाजपच्या बैठकीत मित्रपक्षाला अल्टिमेटम, भाजप नेत्यांवरील टीका टाळण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 17:37 IST

मित्रपक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेते यांच्या संदर्भाने टीका टाळावी, भाजपच्या सर्व नेत्यांचा मान राखला जावा. तसेच मुख्यमंत्र्यांविरोधातील टीका ही भाजप कार्यकर्त्यांना जिव्हारी लागली आहे, हे असेच सुरू राहिल्यास युतीत ताळमेळ राखणे अवघड जाईल, याची नोंद मित्रपक्षाने घ्यावी. यासाठी शिवसेना नेत्यांशी संपर्क साधून त्यांना तसे सांगण्यात यावे, असा निर्णय रत्नागिरीत झालेल्या भाजपच्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्दे भाजप नेत्यांवरील टीका टाळण्याचा सल्लाअन्यथा युतीत ताळमेळ राखणे अवघड

रत्नागिरी : मित्रपक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य नेते यांच्या संदर्भाने टीका टाळावी, भाजपच्या सर्व नेत्यांचा मान राखला जावा. तसेच मुख्यमंत्र्यांविरोधातील टीका ही भाजप कार्यकर्त्यांना जिव्हारी लागली आहे, हे असेच सुरू राहिल्यास युतीत ताळमेळ राखणे अवघड जाईल, याची नोंद मित्रपक्षाने घ्यावी. यासाठी शिवसेना नेत्यांशी संपर्क साधून त्यांना तसे सांगण्यात यावे, असा निर्णय रत्नागिरीत झालेल्या भाजपच्या बैठकीत घेण्यात आला.रत्नागिरीत भाजपचे जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी मार्गदर्शन केले. भाजप संघटनेचे काम आणि निवडणूक याची सांगड घालत प्रत्येक तालुक्याने आपली निवडणूक यंत्रणा सज्ज करावी, असे पटवर्धन म्हणाले. विधानसभा निवडणुकीत भाजप नेतृत्वाला अपेक्षित काम सर्वांनी करावे, असे आवाहन केले.युती झाल्यास भाजपला पाच मतदार संघातील किमान २ मतदार संघ मिळावेत, अशी आग्रही मागणी यावेळी तालुकाध्यक्षांनी केली. सद्यस्थितीत जिल्हा कार्यकारिणी अगर पदाधिकारी यांच्या नियुक्त्या प्रलंबित असल्याने संघटनेसंदर्भात द्यावयाचे निर्देश जिल्हाध्यक्ष म्हणून अ‍ॅड.़ पटवर्धन हे व्यक्तिगतरित्या सर्व तालुकाध्यक्षांना देणार आहेत.सर्व तालुकाध्यक्ष व सरचिटणीस यांनी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम अधिक जोमाने करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

या बैठकीला संगमेश्वर तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, रत्नागिरी तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, लांजा तालुकाध्यक्ष यशवंत वाकडे, चिपळूण तालुकाध्यक्ष सतीश मोरे, गुहागरचे सरचिटणीस नीलेश सुर्वे, चिपळूणच्या मनिषा निमकर, राजापूरचे अभिजीत गुरव, खेडचे विनोद चाळके, रत्नागिरीचे प्रशांत डिंगणकर उपस्थित होते.पाचही युतीचे उमेदवार विजयी होतीलभाजप व शिवसेना यांची युती झाल्यास संपूर्ण जिल्ह्यात भाजप संघटना युतीच्या उमेदवारांसाठी काम करेल आणि भाजपप्रणित सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी रत्नागिरीतून पाचही युतीचे आमदार विजयी होतील, असा प्रयत्न करण्याचे आवाहन अ‍ॅड. पटवर्धन यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

टॅग्स :BJPभाजपाRatnagiriरत्नागिरी