शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण विरोधातील कडवईतील आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 20:37 IST

mahavitaran Ratnagiri- जमीनदार व शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई व भाडे मिळावे, या मागणीसाठी कडवई येथे सुरू केलेल्या आंदोलनाची काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी दखल घेऊन मनसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या प्रश्नावर ऊर्जामंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर हे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

ठळक मुद्देहुस्नबानू खलिफे यांनी घेतली दखल ऊर्जामंत्र्याशी भेट घालून देण्याचे आश्वासन

आरवली : जमीनदार व शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई व भाडे मिळावे, या मागणीसाठी कडवई येथे सुरू केलेल्या आंदोलनाची काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी दखल घेऊन मनसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या प्रश्नावर ऊर्जामंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर हे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय ग्रामस्थ महावितरणविरोधात ठिय्या आंदोलनास बसले होते. ज्या शेतकरी व जमीनदार यांच्या जमिनीत महावितरण कंपनीचे विद्युत खांब व मनोरे आहेत. त्या जमीनदार व शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई व भाडे मिळावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते.

दोन दिवस चाललेल्या या आंदोलनाला राजापूर, लांजा, देवरुख, रत्नागिरी, दहिवली, चिपळूण आदी भागातील विविध पक्षाच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दिला. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन तसेच महावितरण कंपनी यांनी याकडे पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.स्वराज्य सामाजिक संघटनेचे अध्यक्ष राजू पोमेंडकर, नवनिर्मिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज, वहाब दळवी, उदय पवार, स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दिला.

यावेळी रमजान गोलंदाज यांनी या आंदोलनाची माहिती काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांना दिली. त्यांनी तत्काळ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जितेंद्र चव्हाण व आंदोलनकर्ते ग्रामस्थ यांच्याशी संपर्क साधला. माजी आमदारांनी लोकांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या या विषयात लक्ष घातल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.आपण या प्रश्नावर ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करून योग्य समाधान न झाल्यास प्रसंगी न्यायालयातही जाऊन जनतेच्या हिताचा हा प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू, असे जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी