शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

महावितरण विरोधातील कडवईतील आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 20:37 IST

mahavitaran Ratnagiri- जमीनदार व शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई व भाडे मिळावे, या मागणीसाठी कडवई येथे सुरू केलेल्या आंदोलनाची काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी दखल घेऊन मनसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या प्रश्नावर ऊर्जामंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर हे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.

ठळक मुद्देहुस्नबानू खलिफे यांनी घेतली दखल ऊर्जामंत्र्याशी भेट घालून देण्याचे आश्वासन

आरवली : जमीनदार व शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई व भाडे मिळावे, या मागणीसाठी कडवई येथे सुरू केलेल्या आंदोलनाची काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी दखल घेऊन मनसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. या प्रश्नावर ऊर्जामंत्र्यांशी चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर हे ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय ग्रामस्थ महावितरणविरोधात ठिय्या आंदोलनास बसले होते. ज्या शेतकरी व जमीनदार यांच्या जमिनीत महावितरण कंपनीचे विद्युत खांब व मनोरे आहेत. त्या जमीनदार व शेतकऱ्यांना कायद्याप्रमाणे नुकसान भरपाई व भाडे मिळावे, या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन छेडण्यात आले होते.

दोन दिवस चाललेल्या या आंदोलनाला राजापूर, लांजा, देवरुख, रत्नागिरी, दहिवली, चिपळूण आदी भागातील विविध पक्षाच्या पदाधिकारी व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दिला. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन तसेच महावितरण कंपनी यांनी याकडे पाठ फिरवल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.स्वराज्य सामाजिक संघटनेचे अध्यक्ष राजू पोमेंडकर, नवनिर्मिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज, वहाब दळवी, उदय पवार, स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेट देऊन पाठिंबा दिला.

यावेळी रमजान गोलंदाज यांनी या आंदोलनाची माहिती काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांना दिली. त्यांनी तत्काळ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जितेंद्र चव्हाण व आंदोलनकर्ते ग्रामस्थ यांच्याशी संपर्क साधला. माजी आमदारांनी लोकांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या या विषयात लक्ष घातल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.आपण या प्रश्नावर ऊर्जामंत्र्यांशी चर्चा करून योग्य समाधान न झाल्यास प्रसंगी न्यायालयातही जाऊन जनतेच्या हिताचा हा प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू, असे जितेंद्र चव्हाण यांनी सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी