शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ठाण्यात बर्ड फ्लूची एंट्री! मंत्री सुनील केदार यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:51 IST

प्रशासनाची टीम त्याठिकाणी कार्यरत आहे. पक्षांचे नमुने घेण्यात आले असून..

रत्नागिरी : ठाण्याच्या शहापूरमधील एका कुक्कुट पालन केंद्रातील ३०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या, सध्या प्रशासनाची टीम त्याठिकाणी कार्यरत आहे. पक्षांचे नमुने घेण्यात आले असून, हे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त हाेईल, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदाररत्नागिरी येथे पत्रकारांशी बाेलताना दिली.

हा भाग सील करण्यात आला आहे. दक्षता म्हणून तेथून पसरणार नाही यासाठी उपाययाेजना करण्यात येत आहे. नुकसानाबाबत धाेरणानुसार शासन मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.रत्नागिरीत आज (शुक्रवार) काॅंग्रेस ओबीसी सेलतर्फे भाजप सरकारविराेधात माेर्चाचे आयाेजन करण्यात आले आहे. या माेर्चासाठी मंत्री सुनील केदार रत्नागिरीत आले हाेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाणे - शहापूर येथील बर्ड फ्ल्यूबाबत पत्रकारांना माहिती दिली.

ते म्हणाले की, जे नुकसान झाले आहे त्याला मदतीची भूमिका शासनाची हाेती. आजही आहे. काही विशिष्ट काळजी घेतली पाहिजे. अचानक हा विषाणू कसा आला याचीही वैज्ञानिकदृष्ट्या चाैकशी करु. कायमस्वरुपी कसे थांबवता येईल, कशी काळजी घ्यावी लागेल याबाबतही विचार केला जाईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा उद्याेग आहे.अलीकडच्या काळात तरुण स्वयंराेजगार म्हणून हा उद्याेग करत आहेत. याला सांभाळण्याची भूमिका व कर्तव्य शासनाची आहे. शासन त्यात नक्की लक्ष घालेल आणि यापुढे असे हाेणार नाही, याची काळजी घेऊ, असेही मंत्री केदार यांनी सांगितले.त्या भागातील पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय झाला आहे का, यावर बाेलताना मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, त्या पूर्वीपासूनच मार्गदर्शक तत्वे पहिल्यापासूनच आहे. ज्याठिकाणी हा संसर्ग हाेताे, ताे इतर भागात पसरू नये याची काळजी घेतली जाते.या राेगाची व्याप्ती अधिक असते. हा राेग पसरला तर पक्षी २४ तासही राहत नाही. पाेल्ट्रीमध्ये हजाराे पक्षी असतात तेवढे नुकसान राज्य आणि उद्याेजकाला परवडणारे नाही, त्यामुळे त्याठिकाणी काळजी घेण्यात आली आहे, असेही मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBird Fluबर्ड फ्लूSunil Kedarसुनील केदार