शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

आंब्याची चव चाखायला यंदा होणार उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 4:13 PM

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेला मोहर कुजल्याने १५ ते २० टक्के पीक वाया गेले आहे. ढगाळ हवामान व ...

रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे आंब्याला आलेला मोहर कुजल्याने १५ ते २० टक्के पीक वाया गेले आहे. ढगाळ हवामान व अधूनमधून बरसणाऱ्या पावसामुळे किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. मोहर वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी कीटकनाशक फवारणी करावी लागत असल्याने आंबा उत्पादन खर्चिक बनले आहे.

ऑक्टोबर हीट आणि दिवाळीपूर्वी थंडी सुरू झाल्याने आंब्याला मोहर येण्याच्या प्रक्रियेने बागायतदार सुखावले हाेते. गेल्या दहा वर्षांत उत्पादनात झालेली घट भरून निघेल अशी अपेक्षा होती. मात्र, दिवाळीपासून टप्प्याटप्प्याने झालेल्या पावसामुळे फुलोऱ्यात आलेला मोहर काळा पडून खराब झाला. मोहर कुजल्याने सुरुवातीचे १५ ते २० टक्के येणारे पीक वाया गेले. पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढल्याने पालवी व मोहर अशी संमिश्र स्थिती सध्या आहे. नोव्हेंबर संपत आला तरी थंडी गायब असून, उकाडा वाढला आहे. शिवाय अधूनमधून पाऊस पडत असून, ढगाळ वातावरण राहत आहे. ढगाळ हवामानामुळे मोहरावर तुडतुडा, उंट अळी, शेंडे पोखरणारी अळी, तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे.

हवामानातील बदलाचा अंदाज घेत कीटकनाशक फवारणी करावी लागते. आतापर्यंत शेतकऱ्यांनी मोहर वाचविण्यासाठी २५ ते ३० टक्के खर्च केला आहे. महागडी, चांगल्या दर्जाची कीटकनाशके फवारली असली तरी दमट हवामान व पावसामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला आहे. यापुढे पाऊस झाला नाही तर पीक उशिरा का होईना येईल. मात्र, थंडी पडण्याची आवश्यकता आहे. थंडीमुळे गतवर्षी ज्या झाडांना फळधारणा झालेली नाही व सध्या पालवी न येता कडक पाला आहे त्या झाडांना मोहोर येण्याची शक्यता आहे.

हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे आंबा उत्पादनही खालावले आहे, शिवाय पीक दिवसेंदिवस खर्चिक बनले आहे. कीटकनाशकांच्या दरात होणारी वाढ, वाढते इंधन दर यामुळे वाढलेला वाहतूक खर्च, यांत्रिक अवजारांसाठीही इंधन वापरावे लागत असल्याने एकूण खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत दर उपलब्ध होत नाही. याबाबत योग्य उपाययोजना शासकीय स्तरावर होणे गरजेचे आहे. - राजन कदम, बागायतदार, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा