शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

रत्नागिरीतील मजगावमधील भोंदूबाबाला एक वर्ष कारावास, घर शुद्धीकरणाच्या नावाखाली केले होते दागिने लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 18:49 IST

हा प्रकार २८ एप्रिल ते १० ऑक्टाेबर २०१६ या कालावधीत घडला हाेता

रत्नागिरी : घरातील माणसे वारंवार आजारी पडतात. औषधोपचार करूनही काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्हाला घराचे शुद्धीकरण करावे लागेल, असे सांगून जादूटोणा करून घरातील महिलांचे सुमारे दीड लाख रुपयांचे दागिने घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार घडला हाेता. हा प्रकार २८ एप्रिल ते १० ऑक्टाेबर २०१६ या कालावधीत घडला हाेता. याप्रकरणी भोंदूबाबा मुश्ताक इसा काझी (५२, रा. मजगाव, रत्नागिरी) याला येथील न्यायालयाने १ वर्ष कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.रत्नागिरी तालुक्यातील भावेआडम येथे राहणारे विलास शंकर तांबे (५२) यांनी फिर्याद दिली हाेती. घरातील काही व्यक्ती सातत्याने आजारी पडत होत्या. औषधोपचार केल्यानंतरही त्यांना अपेक्षित गुण येत नव्हता. याच संधीचा फायदा मजगाव येथील भोंदूबाबा मुश्ताक काझी याने उठवला होता. घरातील माहिती घेतल्यानंतर तुम्हाला घराचे शुद्धीकरण करावे लागेल, असे तांबे यांना सांगितले होते. त्यानुसार त्याने घरात येऊन घरातील महिलांचे वापरातील दागिन्यांचेही शुद्धीकरण करावे लागेल, असे सांगितले.सुमारे दीड लाख रुपये किमतीची ४ मंगळसूत्रे, ४ चेन, २ कानातील कुड्या, साखळी व रोख १ हजार ५०० रुपये घेऊन ताे गेला हाेता. हे दागिने दि. १८ जुलै २०१७ पर्यंत त्याने परत न दिल्याने अखेर विलास तांबे यांनी ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून ९ ऑगस्ट २०१७ राेजी मुश्ताक काझी याला अटक करण्यात आली होती.

या खटल्याची सुनावणी शनिवारी (१७ मार्च) पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी मुश्ताक काझी याला भादंवि कलम ४२० अन्वये १ वर्ष साधा कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ४ दिवस साधा कारावास, जादूटोणा अधिनियम २०१३ चे कलम ३ अन्वये १ वर्ष साधा कारावास व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास ४ दिवस साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली.ग्रामीण पोलिसचे निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलिस हेडकाॅन्स्टेबल एस. एल. पेंढामकर यांनी गुन्ह्याचा तपास केला होता. पैरवी अधिकारी सहायक पाेलिस निरीक्षक डी. बी. सूर्य, सहायक पोलिस उपनिरिक्षक अनंत जाधव, पोलिस हवालदार संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालय