शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

धरणग्रस्तांच्या नावाने निधी गोळा करणाऱ्यांपासून सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तिवरे धरण दुर्घटनेनंतर सद्यस्थितीत बाधितांना कोणतीही अडचण नसतानाही तेथील स्वयंघोषित पुढारी दुर्घटनेच्या नावावर वीजबिलासारखे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : तिवरे धरण दुर्घटनेनंतर सद्यस्थितीत बाधितांना कोणतीही अडचण नसतानाही तेथील स्वयंघोषित पुढारी दुर्घटनेच्या नावावर वीजबिलासारखे किरकोळ काही खर्च दाखवून लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था व राजकीय - सामाजिक क्षेत्रातील मंडळींकडून निधी गोळा करण्याचे काम करत आहेत. त्यामुळे अशा लोकांपासून सावध राहण्याचे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे.

धरण दुर्घटनेला २३ महिने पूर्ण झाले आहेत. बाधित कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी अलोरे येथे २४ घरांचे बांधकाम सुरू आहे. त्यातील १२ घरांचे बांधकाम जयंद्रथ खताते व १२ घरांचे काम दशरथ दाभोळकर करत आहेत. खासदार विनायक राऊत व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या माध्यमातून वीजबिलासारखा जटील प्रश्नही काही दिवसांपूर्वी कायमस्वरूपी निकालात निघाला आहे. मात्र, असे असतानाही येथील स्वयंघोषित पुढारी निधी गोळा करण्याचे काम करत आहेत. दानशूर मंडळींना तिवरे येथील बाधित कुटुंबीयांची सुस्थितीत असलेली परिस्थिती जास्त उगाळून सांगितल्यावर आपलाही हातभार लागावा, अशी जाणीव होऊन अनेकजण मदत करतात. सध्या कोणत्याही प्रकारची अडचण नसताना, काही खर्च नसताना कशासाठी रक्कम गोळा केली जात आहे. शिवाय जमा रक्कम कोणाकडून व कशासाठी आणली, याचा थांगपत्ता बाधित कुटुंबीयांना नसतो. तिवरेतील बाधित कुटुंबीयांचे नाव पुढे करुन मदत मागणाऱ्यांना कोणीही आर्थिक, वस्तूरुपी मदत करू नये, असे आवाहन बाधितांतर्फे अजित चव्हाण, विश्वास घाडदे, संतोष कनावजे, शिवाजी चव्हाण यांनी केले आहे.