शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
7
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
8
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
9
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
10
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
11
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
12
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
13
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
14
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
15
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
16
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
17
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
18
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
19
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
20
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...

वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी जिंकली; मुलींचा जन्मदरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काही जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर घटत असल्याचे पुढे येत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काही जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर घटत असल्याचे पुढे येत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात मागील चार वर्षांत वाढ झालेली दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पालकांमधील सुशिक्षितपणामुळे आज कोणीही मुलींचा जन्माला नकार देत नाहीत. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ होत असून १,००० मुलांमागे ९५२ मुली आहेत. त्यामुळे वंशाच्या दिव्यापुढे बेटी बचाव अशी जनजागृती मुलींच्या जन्मासाठी फायद्याचीच ठरली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मुला-मुलींच्या जन्मदराबाबत दिलेल्या माहितीवरुन गेल्या तीन वर्षांत मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा इतर जिल्ह्यांपेक्षा मुलींच्या जन्मदरात आधीपासूनच पुढेच आहे. सन २०१७-२०१८ मध्ये जन्मलेली मुले-९,०८३, मुली-८,३८४. सन २०१८-२०२० मध्ये जन्मलेली मुले-८,८३२, मुली- ८,८३७ आणि सन २०१९-२०२० मध्ये जन्मलेली मुले-८,१९७, मुली-७,८०४ अशी संख्या आहे. मुलींचा जन्मदर ९४४ वरुन ९५२ वर गेला आहे.

कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात सुशिक्षितपणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे स्त्री भ्रूणहत्येसारखे प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडतच नाहीत. केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातही मुलीच्या जन्माचे स्वागत तेवढ्याच उत्साहाने केले जाते. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कुठेही केला जात नाही म्हणूनच मुलींच्या जन्मदरात जिल्हा नेहमीच आघाडीवर आहे.

लिंग निदानास बंदी

गर्भनिदान प्रतिबंधक कायदा रत्नागिरी शहरामध्ये कडकपणे राबविला जातो. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांच्या ग्रामीण भागामध्ये अनधिकृत गर्भपात केंद्रे बेकायदेशीरपणे चालविली जातात, असे म्हटले जाते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अनधिकृत गर्भपात केंद्र नाहीत. जिल्ह्यात लिंग निदान तसेच गर्भपातासारखे प्रकार पुढे आलेले दिसून येत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात मुलींची जन्मसंख्या वाढत आहे.

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर दरवर्षी वाढत चालला आहे, ही समाधानकारक बाब आहे. जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्या, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचे मोठे योगदान आहे. लिंग निदान तसेच भ्रृणहत्या अशा प्रकारापासून रत्नागिरी जिल्हा दूरच आहे. आरोग्य विभागाकडूनही ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मुलींची संख्या कमी झाल्यास अनेक मुलांना विनालग्न राहावे लागणार आहे. त्यामुळे मुलींची जन्मदर कमी झाल्यास त्याचे परिणामही भावीपिढीला भोगावे लागणार, हे निश्चित आहे.