शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी जिंकली; मुलींचा जन्मदरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काही जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर घटत असल्याचे पुढे येत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काही जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर घटत असल्याचे पुढे येत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात मागील चार वर्षांत वाढ झालेली दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पालकांमधील सुशिक्षितपणामुळे आज कोणीही मुलींचा जन्माला नकार देत नाहीत. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ होत असून १,००० मुलांमागे ९५२ मुली आहेत. त्यामुळे वंशाच्या दिव्यापुढे बेटी बचाव अशी जनजागृती मुलींच्या जन्मासाठी फायद्याचीच ठरली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मुला-मुलींच्या जन्मदराबाबत दिलेल्या माहितीवरुन गेल्या तीन वर्षांत मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा इतर जिल्ह्यांपेक्षा मुलींच्या जन्मदरात आधीपासूनच पुढेच आहे. सन २०१७-२०१८ मध्ये जन्मलेली मुले-९,०८३, मुली-८,३८४. सन २०१८-२०२० मध्ये जन्मलेली मुले-८,८३२, मुली- ८,८३७ आणि सन २०१९-२०२० मध्ये जन्मलेली मुले-८,१९७, मुली-७,८०४ अशी संख्या आहे. मुलींचा जन्मदर ९४४ वरुन ९५२ वर गेला आहे.

कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात सुशिक्षितपणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे स्त्री भ्रूणहत्येसारखे प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडतच नाहीत. केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातही मुलीच्या जन्माचे स्वागत तेवढ्याच उत्साहाने केले जाते. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कुठेही केला जात नाही म्हणूनच मुलींच्या जन्मदरात जिल्हा नेहमीच आघाडीवर आहे.

लिंग निदानास बंदी

गर्भनिदान प्रतिबंधक कायदा रत्नागिरी शहरामध्ये कडकपणे राबविला जातो. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांच्या ग्रामीण भागामध्ये अनधिकृत गर्भपात केंद्रे बेकायदेशीरपणे चालविली जातात, असे म्हटले जाते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अनधिकृत गर्भपात केंद्र नाहीत. जिल्ह्यात लिंग निदान तसेच गर्भपातासारखे प्रकार पुढे आलेले दिसून येत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात मुलींची जन्मसंख्या वाढत आहे.

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर दरवर्षी वाढत चालला आहे, ही समाधानकारक बाब आहे. जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्या, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचे मोठे योगदान आहे. लिंग निदान तसेच भ्रृणहत्या अशा प्रकारापासून रत्नागिरी जिल्हा दूरच आहे. आरोग्य विभागाकडूनही ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मुलींची संख्या कमी झाल्यास अनेक मुलांना विनालग्न राहावे लागणार आहे. त्यामुळे मुलींची जन्मदर कमी झाल्यास त्याचे परिणामही भावीपिढीला भोगावे लागणार, हे निश्चित आहे.