शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वंशाच्या दिव्यापुढे ‘बेटी जिंकली; मुलींचा जन्मदरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काही जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर घटत असल्याचे पुढे येत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काही जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर घटत असल्याचे पुढे येत असताना रत्नागिरी जिल्ह्यात मुलींच्या जन्मदरात मागील चार वर्षांत वाढ झालेली दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पालकांमधील सुशिक्षितपणामुळे आज कोणीही मुलींचा जन्माला नकार देत नाहीत. त्यामुळे मुलींच्या जन्मदरात वाढ होत असून १,००० मुलांमागे ९५२ मुली आहेत. त्यामुळे वंशाच्या दिव्यापुढे बेटी बचाव अशी जनजागृती मुलींच्या जन्मासाठी फायद्याचीच ठरली आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागाने मुला-मुलींच्या जन्मदराबाबत दिलेल्या माहितीवरुन गेल्या तीन वर्षांत मुलींच्या जन्मदरामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हा इतर जिल्ह्यांपेक्षा मुलींच्या जन्मदरात आधीपासूनच पुढेच आहे. सन २०१७-२०१८ मध्ये जन्मलेली मुले-९,०८३, मुली-८,३८४. सन २०१८-२०२० मध्ये जन्मलेली मुले-८,८३२, मुली- ८,८३७ आणि सन २०१९-२०२० मध्ये जन्मलेली मुले-८,१९७, मुली-७,८०४ अशी संख्या आहे. मुलींचा जन्मदर ९४४ वरुन ९५२ वर गेला आहे.

कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात सुशिक्षितपणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे स्त्री भ्रूणहत्येसारखे प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडतच नाहीत. केवळ शहरीच नाही तर ग्रामीण भागातही मुलीच्या जन्माचे स्वागत तेवढ्याच उत्साहाने केले जाते. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव कुठेही केला जात नाही म्हणूनच मुलींच्या जन्मदरात जिल्हा नेहमीच आघाडीवर आहे.

लिंग निदानास बंदी

गर्भनिदान प्रतिबंधक कायदा रत्नागिरी शहरामध्ये कडकपणे राबविला जातो. त्याचबरोबर इतर जिल्ह्यांच्या ग्रामीण भागामध्ये अनधिकृत गर्भपात केंद्रे बेकायदेशीरपणे चालविली जातात, असे म्हटले जाते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अनधिकृत गर्भपात केंद्र नाहीत. जिल्ह्यात लिंग निदान तसेच गर्भपातासारखे प्रकार पुढे आलेले दिसून येत नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात मुलींची जन्मसंख्या वाढत आहे.

जिल्ह्यात मुलींचा जन्मदर दरवर्षी वाढत चालला आहे, ही समाधानकारक बाब आहे. जिल्ह्यातील आशा कार्यकर्त्या, जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांचे मोठे योगदान आहे. लिंग निदान तसेच भ्रृणहत्या अशा प्रकारापासून रत्नागिरी जिल्हा दूरच आहे. आरोग्य विभागाकडूनही ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. मुलींची संख्या कमी झाल्यास अनेक मुलांना विनालग्न राहावे लागणार आहे. त्यामुळे मुलींची जन्मदर कमी झाल्यास त्याचे परिणामही भावीपिढीला भोगावे लागणार, हे निश्चित आहे.