शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

बी पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:33 IST

रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर आरोग्य यंत्रणेतील इतका मोठा बदल कधीही घडला नव्हता. आता शासकीय रुग्णालयांना स्वयंस्फूर्ती येताना दिसत ...

रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर आरोग्य यंत्रणेतील इतका मोठा बदल कधीही घडला नव्हता. आता शासकीय रुग्णालयांना स्वयंस्फूर्ती येताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात अनेक सुविधा यानिमित्ताने उपलब्ध झाल्या. एवढेच नव्हे तर रत्नागिरी कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करताना ऑक्सिजनचा प्लांटही उभारला जात आहे. याच पद्धतीने जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपळुणातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातही ऑक्सिजन प्लांट उभारण्याची तयारी सुरु आहे. तसेच व्हेंटिलेटर बेडची संख्याही वाढवली जात आहे. उत्तर रत्नागिरीतील खेड, दापोली व गुहागर येथील आरोग्य यंत्रणेत मोठे बदल होताना दिसत आहेत. येथे तर काही खासगी डॉक्टरांच्या मदतीने कोरोना केअर सेंटर सुरु झाले आहे. तसेच अन्य सुविधांचाही विचार होत आहे. इतक्या वर्षांत संबंधित तालुक्यांना उपचाराच्या बाबतीत रत्नागिरी व चिपळूणवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता हे तालुकेही आरोग्य सुविधांच्या दृष्टीने परिपूर्ण होताना दिसत आहेत. हा बदल भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. खासगी डॉक्टरांकडून एकत्रित येऊन सामाजिकदृष्ट्या योगदान देण्याचा विचार केला जात आहे. याचाच अर्थ आता आरोग्यासंदर्भात नवी क्रांती घडण्याची वेळ आली आहे. चिपळुणातही अनेक डॉक्टर कोरोनाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पुढाकार घेत आहेत. कोरोना केअर सेंटरसाठी वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करण्यापासून अन्य सुविधा देण्याचीही तयारी दर्शवली आहे. मात्र, नेहमीच वेगळेपण दाखवून देणारे चिपळूणचे राजकारण अशाही परिस्थितीत आडवे येत आहे. कोरोना केअर सेंटरविषयी नगर परिषदेचीच भूमिका महत्त्वाची आहे. परंतु, चिपळूण नगर परिषदेतील लोकप्रतिनिधी अजूनही कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेत आहेत, तर प्रशासन स्वतःहून पावलं उचलायला तयार नाही. खरंतर सुमारे २०० कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या चिपळूण नगर परिषदेला काहीही कठीण नाही. परंतु, त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. या आधीच्या काही घडामोडी व अनुभवांमुळे प्रशासन कोरोना केअर सेंटरविषयी फार गांभीर्याने विचार करत नसावे. परंतु, लोकप्रतिनिधींनी विशेषतः नगराध्यक्षा व नगरसेवकांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एकजूट दाखवण्याची गरज आहे. तरच प्रशासन सकारात्मक विचार करू शकतो. अर्थात प्रत्येकानेच आरोग्य सुविधांच्या बाबतीत ‘बी पॉझिटिव्ह’ होण्याची गरज आहे.

- संदीप बांद्रे