शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

बी पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:33 IST

रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर आरोग्य यंत्रणेतील इतका मोठा बदल कधीही घडला नव्हता. आता शासकीय रुग्णालयांना स्वयंस्फूर्ती येताना दिसत ...

रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर आरोग्य यंत्रणेतील इतका मोठा बदल कधीही घडला नव्हता. आता शासकीय रुग्णालयांना स्वयंस्फूर्ती येताना दिसत आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात अनेक सुविधा यानिमित्ताने उपलब्ध झाल्या. एवढेच नव्हे तर रत्नागिरी कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करताना ऑक्सिजनचा प्लांटही उभारला जात आहे. याच पद्धतीने जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिपळुणातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातही ऑक्सिजन प्लांट उभारण्याची तयारी सुरु आहे. तसेच व्हेंटिलेटर बेडची संख्याही वाढवली जात आहे. उत्तर रत्नागिरीतील खेड, दापोली व गुहागर येथील आरोग्य यंत्रणेत मोठे बदल होताना दिसत आहेत. येथे तर काही खासगी डॉक्टरांच्या मदतीने कोरोना केअर सेंटर सुरु झाले आहे. तसेच अन्य सुविधांचाही विचार होत आहे. इतक्या वर्षांत संबंधित तालुक्यांना उपचाराच्या बाबतीत रत्नागिरी व चिपळूणवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता हे तालुकेही आरोग्य सुविधांच्या दृष्टीने परिपूर्ण होताना दिसत आहेत. हा बदल भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. खासगी डॉक्टरांकडून एकत्रित येऊन सामाजिकदृष्ट्या योगदान देण्याचा विचार केला जात आहे. याचाच अर्थ आता आरोग्यासंदर्भात नवी क्रांती घडण्याची वेळ आली आहे. चिपळुणातही अनेक डॉक्टर कोरोनाच्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पुढाकार घेत आहेत. कोरोना केअर सेंटरसाठी वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध करण्यापासून अन्य सुविधा देण्याचीही तयारी दर्शवली आहे. मात्र, नेहमीच वेगळेपण दाखवून देणारे चिपळूणचे राजकारण अशाही परिस्थितीत आडवे येत आहे. कोरोना केअर सेंटरविषयी नगर परिषदेचीच भूमिका महत्त्वाची आहे. परंतु, चिपळूण नगर परिषदेतील लोकप्रतिनिधी अजूनही कोरोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेत आहेत, तर प्रशासन स्वतःहून पावलं उचलायला तयार नाही. खरंतर सुमारे २०० कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या चिपळूण नगर परिषदेला काहीही कठीण नाही. परंतु, त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. या आधीच्या काही घडामोडी व अनुभवांमुळे प्रशासन कोरोना केअर सेंटरविषयी फार गांभीर्याने विचार करत नसावे. परंतु, लोकप्रतिनिधींनी विशेषतः नगराध्यक्षा व नगरसेवकांनी शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने एकजूट दाखवण्याची गरज आहे. तरच प्रशासन सकारात्मक विचार करू शकतो. अर्थात प्रत्येकानेच आरोग्य सुविधांच्या बाबतीत ‘बी पॉझिटिव्ह’ होण्याची गरज आहे.

- संदीप बांद्रे