शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

Ratnagiri: बांग्लादेशी महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:42 IST

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे अवैधरीत्या वास्तव्य केल्याचा आरोप असलेल्या बांगलादेशी महिलेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सलमा ...

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे अवैधरीत्या वास्तव्य केल्याचा आरोप असलेल्या बांगलादेशी महिलेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सलमा खातून बिलाल मुल्ला ऊर्फ सलमा राहिल भोंबल (वय ३०, रा. साळवी स्टॉप रत्नागिरी, मूळ रा. बांगलादेश) असे या महिलेचे नाव आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी तिला दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती.अडीच महिने कारागृहात असलेल्या सलमाने जामिनासाठी सत्र न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्यासमोर या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सलमा १६ डिसेंबर २०१६ रोजी ९० दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात आली होती. यावेळी तिचे वास्तव्य शृंगारतळी (गुहागर) येथे होते. यानंतर सलमाने राहिल भोंबल याच्याशी विवाह केला. व्हिसाची मुदत संपली असतानाही तिने २०१७ ते २०२५ या कालावधीत अवैधरीत्या भारतात वास्तव्य केले.

सलमाने आधार कार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला, आदी बनावट कागदपत्रे तयार करत भारतात वास्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. तिला १७ जोनवारी रोजी साळवी स्टॉप येथून अटक करण्यात आली होती. संशयित आरोपी ही एक महिला आहे, तिची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. जामीन दिल्यास पोलिसांच्या तपासकार्यात सहकार्य केले जाईल. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन केले जाईल, असे सलमाच्या वतीने वकिलांनी मांडले.सरकार पक्षाकडून जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. संशयित आरोपीने केवळ भारतात अवैध वास्तव्य केले नाही, तर तिने बनावट कागदपत्रे तयार करून घेतली आहेत. याकामी तिला अन्य कुणीतरी मदत केली असण्याची शक्यता आहे. ही बाजू मान्य करून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालयBangladeshबांगलादेशWomenमहिला