शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Ratnagiri: बांग्लादेशी महिलेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:42 IST

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे अवैधरीत्या वास्तव्य केल्याचा आरोप असलेल्या बांगलादेशी महिलेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सलमा ...

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे अवैधरीत्या वास्तव्य केल्याचा आरोप असलेल्या बांगलादेशी महिलेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला. सलमा खातून बिलाल मुल्ला ऊर्फ सलमा राहिल भोंबल (वय ३०, रा. साळवी स्टॉप रत्नागिरी, मूळ रा. बांगलादेश) असे या महिलेचे नाव आहे. १७ जानेवारी २०२५ रोजी तिला दहशतवादविरोधी पथकाकडून अटक करण्यात आली होती.अडीच महिने कारागृहात असलेल्या सलमाने जामिनासाठी सत्र न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांच्यासमोर या जामीन अर्जावर सुनावणी झाली. सलमा १६ डिसेंबर २०१६ रोजी ९० दिवसांचा व्हिसा घेऊन भारतात आली होती. यावेळी तिचे वास्तव्य शृंगारतळी (गुहागर) येथे होते. यानंतर सलमाने राहिल भोंबल याच्याशी विवाह केला. व्हिसाची मुदत संपली असतानाही तिने २०१७ ते २०२५ या कालावधीत अवैधरीत्या भारतात वास्तव्य केले.

सलमाने आधार कार्ड, पॅनकार्ड, जन्मदाखला, आदी बनावट कागदपत्रे तयार करत भारतात वास्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. तिला १७ जोनवारी रोजी साळवी स्टॉप येथून अटक करण्यात आली होती. संशयित आरोपी ही एक महिला आहे, तिची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. जामीन दिल्यास पोलिसांच्या तपासकार्यात सहकार्य केले जाईल. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन केले जाईल, असे सलमाच्या वतीने वकिलांनी मांडले.सरकार पक्षाकडून जामीन अर्जाला विरोध करण्यात आला. संशयित आरोपीने केवळ भारतात अवैध वास्तव्य केले नाही, तर तिने बनावट कागदपत्रे तयार करून घेतली आहेत. याकामी तिला अन्य कुणीतरी मदत केली असण्याची शक्यता आहे. ही बाजू मान्य करून न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCourtन्यायालयBangladeshबांगलादेशWomenमहिला