शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

वानर, माकडांबाबत निर्णयाची प्रतीक्षा; २५ जानेवारीला काढणार पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 14:18 IST

वानर, माकडांच्या राखणीसाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयात कोट्यावधी रूपये खर्च होतात.

रत्नागिरी : वानर, माकडांचा बंदोबस्त करता येत नसेल तर शेतकऱ्यांना आत्मत्येची परवानगी द्या, अशा आशयाचे निवेदन अविनाश काळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना दिले आहे. वानर, माकडांच्या त्रासामुळे शेतकरी आणि बागायतदार प्रचंड त्रासलेले आहेत. वानर, माकडांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेती, भाजीपाला, बागायती करणे म्हणजे डोक्यावर कर्ज वाढवणे अशी परिस्थिती आहे.

वानर, माकडांच्या राखणीसाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयात कोट्यावधी रूपये खर्च होतात. शासन आणि प्रशासन याचा विचार करणार आहे की, नाही ? जिल्ह्यातील शेती क्षेत्रात एक हजार हेक्टर घट झाल्याची अधिकृत कृषी कार्यालयीन आकडेवारी आहे. प्रत्यक्षात घट झालेले क्षेत्र त्यापेक्षा जास्तच असेल. त्याचे कारण कृषी अधिकारी यांनी वन्यप्राणी उपद्रव हेच दिले आहे.

केंद्राकडे नसबंदीची परवानगी न मागता मारण्याची परवानगी तात्काळ मागितली पाहिजे. वानरांना पकडून अभयारण्यात सोडण्याचा तात्पुता उपाय संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रात्यक्षिक होऊन दोन महिने झाले तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने ठोस कार्यवाही करावी अन्यथा दि.२५ जानेवारी ला गोळपपासून सकाळी १० वाजता पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत प्रशासन काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. केंद्राकडे नसबंदीची परवानगी न मागता मारण्याची परवानगी तात्काळ मागितली पाहिजे. वानरांना पकडून अभयारण्यात सोडण्याचा तात्पुता उपाय संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रात्यक्षिक होऊन दोन महिने झाले तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने ठोस कार्यवाही करावी अन्यथा दि.२५ जानेवारी ला गोळपपासून सकाळी १० वाजता पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत प्रशासन काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMonkeyमाकड