शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

वानर, माकडांबाबत निर्णयाची प्रतीक्षा; २५ जानेवारीला काढणार पदयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2024 14:18 IST

वानर, माकडांच्या राखणीसाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयात कोट्यावधी रूपये खर्च होतात.

रत्नागिरी : वानर, माकडांचा बंदोबस्त करता येत नसेल तर शेतकऱ्यांना आत्मत्येची परवानगी द्या, अशा आशयाचे निवेदन अविनाश काळे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांना दिले आहे. वानर, माकडांच्या त्रासामुळे शेतकरी आणि बागायतदार प्रचंड त्रासलेले आहेत. वानर, माकडांमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे शेती, भाजीपाला, बागायती करणे म्हणजे डोक्यावर कर्ज वाढवणे अशी परिस्थिती आहे.

वानर, माकडांच्या राखणीसाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयात कोट्यावधी रूपये खर्च होतात. शासन आणि प्रशासन याचा विचार करणार आहे की, नाही ? जिल्ह्यातील शेती क्षेत्रात एक हजार हेक्टर घट झाल्याची अधिकृत कृषी कार्यालयीन आकडेवारी आहे. प्रत्यक्षात घट झालेले क्षेत्र त्यापेक्षा जास्तच असेल. त्याचे कारण कृषी अधिकारी यांनी वन्यप्राणी उपद्रव हेच दिले आहे.

केंद्राकडे नसबंदीची परवानगी न मागता मारण्याची परवानगी तात्काळ मागितली पाहिजे. वानरांना पकडून अभयारण्यात सोडण्याचा तात्पुता उपाय संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रात्यक्षिक होऊन दोन महिने झाले तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने ठोस कार्यवाही करावी अन्यथा दि.२५ जानेवारी ला गोळपपासून सकाळी १० वाजता पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत प्रशासन काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. केंद्राकडे नसबंदीची परवानगी न मागता मारण्याची परवानगी तात्काळ मागितली पाहिजे. वानरांना पकडून अभयारण्यात सोडण्याचा तात्पुता उपाय संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यात सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रात्यक्षिक होऊन दोन महिने झाले तरी त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे वानर, माकडांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारने ठोस कार्यवाही करावी अन्यथा दि.२५ जानेवारी ला गोळपपासून सकाळी १० वाजता पदयात्रा काढण्यात येणार असल्याचे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत प्रशासन काय कारवाई करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMonkeyमाकड