शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

शृंगारपूर ग्रामस्थांनी ठोकले शाळेला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 14:03 IST

संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर शाळेत ४१ विद्यार्थी असून, सातवीपर्यंत फक्त दोन शिक्षकच कार्यरत आहेत. या दोनही शिक्षकांची बदली करण्यात आली असून, अद्याप एकही शिक्षक न मिळाल्याने ग्रामस्थांनी अखेर शुक्रवारी शाळेलाच टाळे ठोकले.

ठळक मुद्देशृंगारपूर ग्रामस्थांनी ठोकले शाळेला टाळेशिक्षक न मिळाल्याने पुकारले शाळा बंद आंदोलन

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर शाळेत ४१ विद्यार्थी असून, सातवीपर्यंत फक्त दोन शिक्षकच कार्यरत आहेत. या दोनही शिक्षकांची बदली करण्यात आली असून, अद्याप एकही शिक्षक न मिळाल्याने ग्रामस्थांनी अखेर शुक्रवारी शाळेलाच टाळे ठोकले.शृंगारपूर शाळेतील कार्यरत दोन शिक्षकांची बदली झाल्यानंतर या शाळेवर अद्याप एकाही शिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली नाही. शाळेवर शिक्षक मिळून विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी येथील ग्रामस्थ व पालक जूनपासून शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, त्यानंतरही अद्याप शिक्षक देण्यात आलेला नाही. अखेर शिक्षक मिळत नसल्याने ग्रामस्थ व पालकांनी शुक्रवारी सकाळी शाळा बंद आंदोलन पुकारले.शिक्षक मिळावा म्हणून पालकांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली होती. पण त्यांच्याकडून पालकांना प्रतिसाद मिळाला नाही. शुक्रवारी सकाळी शाळा बंदची कल्पना देऊनही प्रशासनाचा कोणीही प्रतिनिधी सोडाच केंद्रप्रमुखही न पोहचल्याने ग्रामस्थ व पालक झाले आक्रमक झाले होते.ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सकाळी ११.३० वाजता केंद्रप्रमुख महेश जाधव एक शिक्षिका घेऊन शाळेत हजर झाले. दुसऱ्या शिक्षकाला आपण सोमवारपर्यंत हजर करतो, आपण हे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती त्यांनी यावेळी ग्रामस्थांना केली. मात्र, त्यानंतर आधी दुसरापण शिक्षक आणा तरचं शाळा उघडू असे ग्रामस्थांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे केंद्रप्रमुखांनी तेथून काढता पाय घेतला. 

 

टॅग्स :SchoolशाळाRatnagiriरत्नागिरी