शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

राजापुरात अणु की सौरऊर्जा प्रकल्प?, ९५ टक्के प्रकल्पग्रस्तांनी स्वीकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 17:43 IST

RajapurJaitapur -राजापूर तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्पाविरुध्द एक दशकाहून अधिक काळ प्रखर विरोध होत असतानाच दुसरीकडे प्रकल्प क्षेत्रातील बाधित पाच गावातील सुमारे ९५ टक्के लाभार्थ्यांनी मोबदला आणि सानुग्रह अनुदान स्वीकारले आहे.

ठळक मुद्दे९५ टक्के प्रकल्पग्रस्तांनी स्वीकारलेअनुदान प्रकल्पाविरोधातील भूमिका बदलली

राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्पाविरुध्द एक दशकाहून अधिक काळ प्रखर विरोध होत असतानाच दुसरीकडे प्रकल्प क्षेत्रातील बाधित पाच गावातील सुमारे ९५ टक्के लाभार्थ्यांनी मोबदला आणि सानुग्रह अनुदान स्वीकारले आहे.आजपर्यंत १ हजार ८४५ खातेदारांना मूळ अनुदानापोटी १३ कोटी ६५ लाख, तर सानुग्रह अनुदानापोटी १९५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे त्या प्रकल्पातील अडथळे आता दूर झाले आहेत. मात्र, सौरऊर्जा प्रकल्पाच्या मागणीमुळे आता अणुऊर्जा प्रकल्पाचे काय होणार, याकडे लक्ष लागले आहे.जगातील सर्वात मोठा असा १० हजार मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प राजापूर तालुक्यातील माडबन गावी मंजूर झाला होता. त्यासाठी जैतापूर परिसरातील माडबन, मिठगवाणे, करेली, निवेली व वरचीवाडी अशा गावातील जमिनी संपादीत केल्या होत्या.

या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यापासूनच स्थानिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली. मात्र, गेल्या काही वर्षात हा विरोध मावळला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त पाच गावातील सुमारे ९५ टक्के प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांनी जमिनीचा मोबदला आणि सानुग्रह अनुदान स्वीकारून अणुऊर्जा प्रकल्पाला एक प्रकारे संमतीच दर्शविली आहे.सन २०१८ अखेर जैतापूर प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन २०२५ ला पहिला रिॲक्टर सुरु होईल व २०२७ पर्यंत सर्वच्या सर्व सहा रिॲक्टरमधून ऊर्जा निर्मिती होईल, अशी शक्यता देवेंद्र फडणवीस यांच्या काळात वर्तविण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत अणुऊर्जा प्रकल्पाचे काम ठप्प झाल्याने प्रकल्पाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.२०८ कोटींचे वाटपप्रस्तावित जैतापूर माडबन अणुऊर्जा प्रकल्प क्षेत्रात सुमारे २ हजार ३३६ प्रकल्पग्रस्त आहेत. या प्रकल्पग्रस्तांना मूळ अनुदानापोटी १४ कोटी ७७ लाख रुपये, तर सानुग्रह अनुदानापोटी २११ कोटी ५ लाख इतके अनुदान देय आहे. यापैकी १ हजार ८४५ लाभार्थ्यांनी १३ कोटी ६५ लाख रुपयांचे मूळ अनुदान स्वीकारले आहे, तर सानुग्रह अनुदानाला पात्र असलेल्या लाभार्थ्यांनी सुमारे १९५ कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान स्वीकारले आहे. केवळ ५ टक्के लाभार्थ्यांनीच अनुदान स्वीकारलेले नाही. यापैकी काही लाभार्थ्यांचे अनुदान हे वारस तपास व न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रलंबित आहे, तर काही लाभार्थ्यांचे अनुदान अचूक पत्ते न सापडल्याने प्रलंबित आहे. 

टॅग्स :Jaitapur atomic energy plantजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पRatnagiriरत्नागिरीRajapurराजापुर