शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

प्रशासकीय यंत्रणांकडून सर्वेतोपरी मदतकार्य - सुनील चव्हाण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 19:45 IST

गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या पावसाचा ओघ कमी झाला आहे. या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी संकटात अडकलेल्यांची सुटका आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली.

रत्नागिरी - गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या पावसाचा ओघ कमी झाला आहे. या कालावधीत सर्वच प्रशासकीय यंत्रणांनी संकटात अडकलेल्यांची सुटका आणि त्यांना सर्वतोपरी मदत दिली. सोबतच आता रोगराई पसरु नये, याची खबरदारी घेतली जात आहे. शक्य तितक्या पात्र व्यक्तींना तातडीची मदत प्रशासनाने दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.जुलै  महिन्याच्या प्रारंभी पावसामुळे चिपळूण तालुक्यात तिवरे धरण फुटून भेंदवाडी गाव वाहून गेले होते. यासह आतापर्यंत २८ व्यक्तींचा पूरात मृत्यु झाला आहे. इतर अपघातात एकजण मरण पावला एकूण २९ पैकी पात्र ठरलेल्यांची संख्या २४ असून त्यापैकी  २२ जणांच्या वारसांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आर्थिक मदत पुरविण्यात आली आहे. या पावसात १५९ जनावरे वाहून गेली तर ७६३ घरांचे नुकसान झाले आहे. सर्व मालमत्तेचे आतापर्यंत झालेले नुकसान १० कोटी २८ लाख रुपये  असल्याची माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.जिल्हयात ३ मोठी धरणे असून ती पूर्णपणे सुरक्षित आहेत तसेच ४६ लघूप्रकल्प असून ते सर्व सुरक्षित आहेत. मृदसंधारण अंतर्गत १६ धरणे असून त्यापैकी ९ पूर्णपणे सुरक्षित असून असुरक्षित वाटणाºया ७ प्रकल्पातील पाणीसाठा कमी करुन त्यांनाही या पातळीवर आणण्याचे काम प्रशासनाने केले असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.पुरानंतर आजार पसरण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचे उपाय सुरु आहेत. याबाबत जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. चिपळूण, खेड तसेच  रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे आरोग्य तपासणी पथके तैनात करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.पावसाळ्यातील आपत्ती काळात जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील नियंत्रण केंद्रातून अहोरात्र (२४ तास) परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या सर्व काळात महसूल, पोलीस तसेच इतर यंत्रणांनी उत्तम काम केले असून त्यांचे आपण कौतुक करतो, असे  जिल्हाधिकारी यांनी सांगितले. महामार्ग बंदची समस्यायंदाच्या पावसाळयात चिपळूणमधील वाशिष्टी नदीला पूर आल्याने १० वेळा तर खेड जवळ जगबुडी नदीला पूर आल्याने १३ वेळा मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवावी लागली. राजापूर तालुक्यात अर्जुना नदीच्या पूराची पातळी वाढल्याने कोदवली पुलावरील वाहतूक ११ वेळा बंद झाली. जगबुडीची नदीची पातळी ९.५ मीटरपर्यंत वाढल्याची नोंद या काळात झाली. २०१६ साली याठिकाणी सर्वाधिक ११.३ मीटर  पातळीची नोंद झाली होती. जमिनींना भेगासतत मुसळधार पावसामुळे जमिनीला भेगा पडण्याचा घटना या काळात मोठया प्रमाणात घडल्या. गुहागर आणि दापोली तालुके वगळता इतर तालुक्यात २६ ठिकाणी जमिनीला भेगा गेल्या आहेत.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी