शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

रत्नागिरी जिल्ह्यात श्रावणात आषाढधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:15 IST

श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याऐवजी आषाढासारखाच पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्याला चांगलाच दणका दिला असून, सर्वाधिक पाऊस उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पडला आहे. या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरील वाहतूक आज सकाळी पुन्हा बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात श्रावणात आषाढधारादरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

रत्नागिरी : श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याऐवजी आषाढासारखाच पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्याला चांगलाच दणका दिला असून, सर्वाधिक पाऊस उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पडला आहे. या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरील वाहतूक आज सकाळी पुन्हा बंद करण्यात आली आहे.शुक्रवारी दुपारपासून पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात आषाढासारखे आगमन केले आहे. त्यामुळे रात्री राजापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. मध्यरात्रीनंतर पावसाचा वेग काहीसा कमी असल्याने पुराचे पाणी ओसरले. सकाळपासून पुन्हा पावसाने प्रमाण वाढले.मुसळधार पावसामुळे रात्री साडेअकरा वाजता जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. मात्र सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर पुन्हा पाण्याची पातळी वाढल्यामुळे साडेदहा वाजता ही वाहतूक बंद करण्यात आली. जगबुडी तसेच नारिंगी नदीचे पाणी वाढल्यामुळे खेड-दापोली रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे काही वेळासाठी हा मार्गही बंद करण्यात आला होता. संगमेवर तालुक्यातील गोळवली-करजुवे या अंतर्गत रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झाली आहे. दरड हटवण्याचे काम सुरू आहे.कशेडी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावरील वाहतूक विन्हेरे, मंडणगड मार्गे वळवण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी