शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

रत्नागिरी जिल्ह्यात श्रावणात आषाढधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:15 IST

श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याऐवजी आषाढासारखाच पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्याला चांगलाच दणका दिला असून, सर्वाधिक पाऊस उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पडला आहे. या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरील वाहतूक आज सकाळी पुन्हा बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात श्रावणात आषाढधारादरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

रत्नागिरी : श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याऐवजी आषाढासारखाच पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्याला चांगलाच दणका दिला असून, सर्वाधिक पाऊस उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पडला आहे. या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरील वाहतूक आज सकाळी पुन्हा बंद करण्यात आली आहे.शुक्रवारी दुपारपासून पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात आषाढासारखे आगमन केले आहे. त्यामुळे रात्री राजापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. मध्यरात्रीनंतर पावसाचा वेग काहीसा कमी असल्याने पुराचे पाणी ओसरले. सकाळपासून पुन्हा पावसाने प्रमाण वाढले.मुसळधार पावसामुळे रात्री साडेअकरा वाजता जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. मात्र सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर पुन्हा पाण्याची पातळी वाढल्यामुळे साडेदहा वाजता ही वाहतूक बंद करण्यात आली. जगबुडी तसेच नारिंगी नदीचे पाणी वाढल्यामुळे खेड-दापोली रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे काही वेळासाठी हा मार्गही बंद करण्यात आला होता. संगमेवर तालुक्यातील गोळवली-करजुवे या अंतर्गत रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झाली आहे. दरड हटवण्याचे काम सुरू आहे.कशेडी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावरील वाहतूक विन्हेरे, मंडणगड मार्गे वळवण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी