शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

रत्नागिरी जिल्ह्यात श्रावणात आषाढधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 15:15 IST

श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याऐवजी आषाढासारखाच पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्याला चांगलाच दणका दिला असून, सर्वाधिक पाऊस उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पडला आहे. या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरील वाहतूक आज सकाळी पुन्हा बंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यात श्रावणात आषाढधारादरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

रत्नागिरी : श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याऐवजी आषाढासारखाच पाऊस पडत आहे. शुक्रवारपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने जिल्ह्याला चांगलाच दणका दिला असून, सर्वाधिक पाऊस उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात पडला आहे. या पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावरील वाहतूक आज सकाळी पुन्हा बंद करण्यात आली आहे.शुक्रवारी दुपारपासून पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात आषाढासारखे आगमन केले आहे. त्यामुळे रात्री राजापूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. मध्यरात्रीनंतर पावसाचा वेग काहीसा कमी असल्याने पुराचे पाणी ओसरले. सकाळपासून पुन्हा पावसाने प्रमाण वाढले.मुसळधार पावसामुळे रात्री साडेअकरा वाजता जगबुडी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. मात्र सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर पुन्हा पाण्याची पातळी वाढल्यामुळे साडेदहा वाजता ही वाहतूक बंद करण्यात आली. जगबुडी तसेच नारिंगी नदीचे पाणी वाढल्यामुळे खेड-दापोली रस्त्यावर पाणी आले. त्यामुळे काही वेळासाठी हा मार्गही बंद करण्यात आला होता. संगमेवर तालुक्यातील गोळवली-करजुवे या अंतर्गत रस्त्यावर दरड कोसळून वाहतूक बंद झाली आहे. दरड हटवण्याचे काम सुरू आहे.कशेडी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत दरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. महामार्गावरील वाहतूक विन्हेरे, मंडणगड मार्गे वळवण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी