शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रत्नागिरीत उन्हाळ्यात यंदाही हंडा डोक्यावरच, निधी थकल्याने ठेकेदारांनी बंद केली ‘जलजीवन’ची कामे

By रहिम दलाल | Updated: February 10, 2025 16:40 IST

रहीम दलाल रत्नागिरी : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करण्यात आली ...

रहीम दलालरत्नागिरी : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र, कामे पूर्ण होऊनही शासनाकडून ७० कोटी रुपयांची ठेकेदारांची बिले थकीत राहिल्याने शेवटच्या टप्प्यात असलेली अनेक कामे ठेकेदारांनी बंद केली आहेत. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यातही महिलांच्या डोक्यावर हंडा कायम राहणार आहे.जलजीवन मिशन प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात १ हजार ४३२ पाणीपुरवठा योजनांपैकी ४३९ कामे पूर्ण झाली आहेत, तर ३१९ याेजना पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. कामे पूर्ण करण्यासाठी सप्टेंबर, २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या कालावधीत कामे पूर्ण न झाल्याने या कामांना मुदत वाढवून देण्यात आली. जलजीवन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांची सुमारे ७० कोटी रुपयांची बिले मिळावीत, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून निधी रखडल्याने कामे दिलेल्या मुदतीत कशी पूर्ण होणार, असा प्रश्न जिल्हा परिषदेला सतावत आहे.२०१९ पासून ‘जलजीवन’ला सुरुवातजलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांची कामे सुरुवातीपासून जलद गतीने सुरू होती. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून वेळोवेळी कामांचा आढावा घेण्यात येत हाेता, तसेच ठेकेदारांना सूचना देण्यात येत होत्या.जिल्ह्यात किती पाणी योजनांच्या कामांना मंजुरी?जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १ हजार ४३२ पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर आहेत. त्यासाठी सुमारे १ हजार १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंजूर कामांपैकी काही ४३९ कामे पूर्ण झाली आहेत. तर ११६ कामे ० ते २५ टक्के, १८८ कामे २५ ते ५० टक्के, ३६६ कामे ५० ते ७५ टक्के काम झाले असून ३१९ कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत.७० टक्के कामे प्रलंबितजलजीवनअंतर्गत पाणी योजनांची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र, आता शासनाकडून निधी उपलब्ध नसल्याने कामे प्रलंबित राहिली आहेत.५५ लिटर पाणीपुरवठा प्रतिदिन, प्रतिव्यक्तीप्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर प्रमाणे पाण्याची देणे अपेक्षित आहे.सर्व तालुक्यात पाणीपुरवठ्याची कामे सुरू होतीजलजीवन मिशनअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊही तालुक्यांमध्ये कामे सुरू होती. त्यामुळे एकही तालुका नाही जेथे कामे सुरू झालेली नाहीत. मात्र, शासनाकडून निधी आलेला नाही.उन्हाळ्यात पुन्हा डोक्यावर हंडाजिल्ह्यात जलजीवनअंतर्गत एकूण १४३२ योजना राबविण्यात येत असून, त्यापैकी ४३९ कामे पूर्ण झाली आहेत. तर, ९८९ कामे अपूर्ण असल्याने उन्हाळ्यात पुन्हा महिलांच्या डोक्यावर हंडा येणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी