संदीप बांद्रे
चिपळूण : विधानसभेचे विशेष अधिवेशन संपताच कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी कुटुंबासह शेतीमध्ये रमले आहेत. आमदार जाधव यांचे एकत्र कुटुंब असून दरवर्षी भात, नाचणी, मका यासह विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला लागवड ते करतात.समाजकारण व राजकारणात कितीही मोठ्या पदावर पोहोचले तरी भास्कर जाधव यांनी गावाकडची नाळ तोडली नाही. ते सुगीच्या दिवसात स्वत: शेतातील कामे करतात. दरवर्षी न चुकता ते शेतामध्ये उतरतात. पॉवर टिलरने शेती नांगरून सर्व प्रकारच्या कामांना मोठा हातभार लावतात. आपल्याच शेतात कष्ट करून पिकवलेलं धान्य आपल्याला वर्षभर पुरतं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.