शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
3
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
4
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
5
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
6
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
7
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
8
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
9
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
10
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
11
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
12
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
13
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
14
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
15
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
16
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
17
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
18
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
19
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
20
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर

तब्बल ३ हजार ४०० विद्यार्थ्यांनी घातले १ लाख सूर्यनमस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 11:55 IST

सूर्यनमस्कार हे सर्वांगासन असून, दिवसाला ठराविक सूर्यनमस्कार घातल्यास प्रकृतीस्वास्थ उत्तम राहते. सूर्यनमस्काराचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. शनिवारी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर तब्बल ३ हजार ४०० विद्यार्थ्यांनी १ लाख सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प पूर्ण केला.

ठळक मुद्देतब्बल ३ हजार ४०० विद्यार्थ्यांनी घातले १ लाख सूर्यनमस्काररत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे उपक्रम

रत्नागिरी : सूर्यनमस्कार हे सर्वांगासन असून, दिवसाला ठराविक सूर्यनमस्कार घातल्यास प्रकृतीस्वास्थ उत्तम राहते. सूर्यनमस्काराचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर तब्बल ३ हजार ४०० विद्यार्थ्यांनी १ लाख सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प पूर्ण केला.जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. गतवर्षी या उपक्रमात ४ हजार विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते. या सर्वांनी मिळून १ लाख ३४ हजार सूर्यनमस्कार घातले होते. त्यामुळे यंदा यापेक्षा जास्त सूर्यनमस्कार घालण्याचा संकल्प सोसायटीतर्फे करण्यात आला होता.रत्नागिरीतील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर पहाटे ५.३० वाजल्यापासून विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात केली. यामध्ये पालकांचाही समावेश होता. यावेळी सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, बापू गवाणकर, विश्वनाथ बापट, रमा जोग यांच्यासह शाळांचे शिक्षक, पालक उपस्थित होते.विद्यार्थ्यांचे गट करून त्यांच्याकडून तालबद्ध सूर्यनमस्कार घालून घेण्यात येत होते. या उपक्रमात जी. जी. पी. एस्., शिर्के हायस्कूल, जांभेकर विद्यालय, केळ्ये हायस्कूल, अभ्यंकर कुलकर्णी ज्युनिअर कॉलेज, लॉ कॉलेज, फाटक हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, देसाई हायस्कूल, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृहमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी शिल्पा पटवर्धन यांनी बोलताना सांगितले की, उत्तम जीवन जगण्यासाठी मनाचे आरोग्य, बुद्धीचे आरोग्य आणि देहाचे आरोग्य चांगले राहणे गरजेचे आहे. सूर्यनमस्कार हा तीन आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करते. सूर्यनमस्काराने माणसाचा रजोगुण कमी होतो. विद्यार्थ्यांसह देशाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सूर्यनमस्कार महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.प्राचार्य किशोर सुखटणकर म्हणाले की, विद्यार्थ्यांची मानसिक व शारीरिक क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी सूर्यनमस्कार महत्वाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे असून, सूर्यनमस्काराचा संकल्प दरवर्षी राबवण्यात यावा, असे सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यRatnagiriरत्नागिरी