शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ६० तासांनी अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी खुला, दरडींचा धाेका वाढल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 11:47 IST

पाचल : मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोसळली हाेती. ही दरड सोमवारी सायंकाळी ...

पाचल : मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोसळली हाेती. ही दरड सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हटवण्यात बांधकाम विभागाला यश आले. तब्बल ६० तासांनंतर अणुस्कुरा घाटातील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.तालुक्यात शनिवारी पावसाचा जाेर वाढला हाेता. मुसळधार पावसामुळे राजापूर आणि काेल्हापूरला जाेडल्या जाणाऱ्या अणुस्कुरा घाटात दरड काेसळली हाेती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली हाेती. तब्बल तीन दिवस भर पावसात ही दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, माती हटवताना मातीच्या ढिगाऱ्याखाली मोठे दगड असल्याने व दगडांचा आकार मोठा असल्याने ते तीन ते चार वेळा ब्लास्ट करून हटवण्यात आले.

हा मार्ग बंद असल्याने कोकणात अणुस्कुरा मार्गाने येणारी वाहतूक तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पर्यायी मार्ग म्हणून अनेकांनी गगनबावडा मार्ग निवडला होता. मात्र, अणुस्कुरा घाट बंद असल्याने घाट माथ्यावरून येणारी मालवाहतूक बंदच हाेती. मात्र, तब्बल तीन दिवसांनी साेमवारी सायंकाळी या मार्गावरील दरड हटविण्यात यश आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.

मार्ग ठरताेय साेयीचागेल्या दोन-तीन वर्षांत मुंबईहून कोकणाकडे येणारा जवळचा मार्ग म्हणून या मार्गाची माहिती मिळाल्याने अनेकजण या मार्गाने कोकणात येतात. पुणे, कोल्हापूरहून राजापूर, सावंतवाडीला येण्यासाठीही हा मार्ग साेयीचा ठरत आहे. दिवसभरात पाचशे ते सहाशे वाहनांची वर्दळ या मार्गावर असते. मात्र, घाटात दरडींचा धाेका वाढल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागताे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलन