शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

रत्नागिरी : रिफायनरीविरोधी शिवसेनेची आंदोलने लुटुपूटूची : अशोक वालम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 4:43 PM

रिफायनरीविरोधात शिवसेना सुरुवातीपासून आहे हे धादांत खोटे आहे. कारण, मुख्यमंत्री जानेवारी २०१६ पासून कोकणात पश्चिम किनारपट्टीवर रिफायनरीसाठी जागा देणार, असे केंद्र्रीय पेट्रोलियम मंत्री याना सांगत होते तेंव्हा कधी सेना नेत्यांनी त्यास विरोध केला नाही.

ठळक मुद्देरिफायनरीविरोधी शिवसेनेची आंदोलने लुटुपूटूची : अशोक वालमराजन साळवी यांच्या विधानांचा घेतला समाचार

राजापूर : रिफायनरीविरोधात शिवसेना सुरुवातीपासून आहे हे धादांत खोटे आहे. कारण, मुख्यमंत्री जानेवारी २०१६ पासून कोकणात पश्चिम किनारपट्टीवर रिफायनरीसाठी जागा देणार, असे केंद्र्रीय पेट्रोलियम मंत्री याना सांगत होते तेंव्हा कधी सेना नेत्यांनी त्यास विरोध केला नाही.

मोदींनी एप्रिल २०१६ रोजी सौदीच्या सुलतानाला कोकणात रिफायनरी उभारण्याबद्दल आश्वस्त केले, तरीही सेनेचा विरोध दिसला नाही. उलट शिवसेनेने रिफायनरीविरोधी लुटुपूटूची आंदालने करून स्थानिकांच्या डोळ्यात धूळ फेकल्याचा आरोप रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांनी म्हटले आहे.आमदार राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी वालम यांच्यावर आरोप केले होते. त्याचा समाचार वालम यांनी घेतला आहे. सप्टेंबर २०१६ रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय समितीची बैठक होऊन महाराष्ट्र औद्योगीक विकास अधिनियम, १९६१अंतर्गत रिफायनरी साठी भूसंपादन करायचे ठरले, तेव्हाही सेनेचे नेते गप्पच होते. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे अगदी मार्च २०१८पर्यंत रिफायनरीची भलावणच करीत होते.मुख्यमंत्री अध्यादेश रद्द करीत नाहीत म्हणून शिवसेनेने फडणवीस सरकारला अडचणीत आणले असे कधी दिसले नाही. उलट अमित शाह भेट, संसदेतील अविश्वास ठरावाचेवेळी बोटचेपीच भूमिका सेनेने घेतली. स्थानिक पातळीवर लुटुपुटूची आंदोलन करताना मात्र यांचे आमदार-खासदार दिसत होते.

१२ सप्टेंबर १७ रोजी आमदार राजन साळवी मुख्यमंत्र्यांशी स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसहित २७ मागण्या घेऊन गेले आणि या मागण्या मान्य झाल्यास आम्हाला प्रकल्प मान्य आहे असे सांगितले. हा ग्रामस्थांचा मोठा विश्वासघात होता. कुणालाही न विचारता त्यांनी हे जे पाऊल उचलले ते साफ चुकीचे होते, असे वालम यांनी म्हटले आहे.२० नोव्हेंबर २०१७ रोजी संयुक्त जमीन मोजणी सुरु होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे यांना आठवडाभर आधीच पत्र देण्यात आली. पण कसलीही हालचाल सेनेमार्फत झाली नाही. शेवटी आम्ही जनतेने रस्त्यावर उतरून मोजणी थांबिवली. उद्योगमंत्र्यांची अध्यादेश रद्द करण्याची घोषणा आणि कागदोपत्री कार्यवाही मंत्रालयात धूळ खात पडलेली आहे.

सरकारमार्फत मात्र अजून सुकथनकर समितीसारखे प्रकल्प समर्थनार्थ कारवाया सुरूच आहेत. म्हणूनच शिवसेनाच हा दावा की सुरुवातीपासून रिफायनरी ला विरोध आहे ,हे पूर्ण असत्य आहे, असे वालम यांनी म्हटले आहे.प्र्रकल्पग्रस्त गावातील ५३ शेकडो वर्षे जुनी मंदिरे, जी स्थानिक जनतेची श्रद्धास्थाने आहेत, ती रिफायनरी करता भुईसपाट करण्यात येण्याचे प्रस्तावित आहेत.

स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या भक्तिभावाचे सोयर-सुतक सेनेला नाही. दिनांक १४ नोव्हेंबर २०१८ रोजी राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी राजापूरात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले की, यापुढे नाणार रिफायनरी विरोधी आंदोलनात शिवसेना कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटनेच्या कुठल्याच आंदोलनात सहभागी होणार नाही.वास्तविक शिवसेना आतापर्यंत आम्ही संघटनेने गेल्या दिड वर्षांत केलेल्या नाणार रिफायनरी विरोधी आंदोलनात कधी उतरलीच नाही. मग हे काही राजन साळवींनी नवीन सांगितले नाही. खरंतर सुरवाती पासून जे त्यांच्या पोटात होते ते आता ओठातून आले, असे वालम यांनी म्हटले आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी