शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविका ‘नाॅट रिचेबल’; ऑफलाईन अहवालाचा ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अंगणवाड्यांचा कारभार डिजिटल करण्यासाठी शासनाने २०१९ मध्ये जिल्ह्यातील २,८७२ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : अंगणवाड्यांचा कारभार डिजिटल करण्यासाठी शासनाने २०१९ मध्ये जिल्ह्यातील २,८७२ अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले होते. मात्र, मोबाईलमुळे अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणी येऊ लागल्या. अखेर जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी सेविकांनी मोबाईल शासनाला परत केले.

अनेकांचे मोबाईल नादुरुस्तही झालेले होते. तसेच पोषण ट्रॅकर ॲपवर माहिती भरतानाही त्यांना अडचणीचे ठरत होते. आता ज्यांच्याकडे जुनी रजिस्टर आहेत ते भरून देत आहेत. मात्र, ज्यांच्याकडे रजिस्टर नाही. त्यांना ते विकत घ्यावे लागले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका ऑफलाईन काम करत आहेत.

कामांचा व्याप

अंगणवाडी सेविकांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांच्या अडचणींकडे शासनाकडून नेहमीच दुर्लक्ष करण्यात आल्याने वेळोवेळी आंदोलने करण्यात येतात. कामांच्या अतिरेकी ओझ्याखाली त्या दबून गेल्या आहेत. त्यांना मानधनही कमी आहे. मात्र, काम जास्त आहे, अशी स्थिती आहे.

जिल्ह्यातील अंगणवाड्या

२८७२

शासनाकडून दबाव येत आहे

मोबाईल परत दिले असले तरी ऑफलाईन काम सुरू आहे. कामाचे केवळ फोटो शासनाला पाठविले जात आहेत. ज्यांच्याकडे रजिस्टर नाही ते साधे बुक घेऊन अहवाल तयार करीत आहेत. त्याचबरोबर शासनाकडून माेबाईल परत घ्या, असाही दबाव आमच्यावर आणला जात आहे.

- नफीसा नाखवा, जिल्हाध्यक्षा

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, रत्नागिरी

अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी शासनाकडून देण्यात आलेले मोबाईल परत केले. तरीही अंगणवाडी सेविका आजही आपले काम ऑफलाईन करीत आहेत. मोबाईल परत घ्या. नाही तर धान्य दिले जाणार नाही. पगार दिला जाणार नाही, अशा प्रकारच्या धमक्या अंगणवाडी सेविकांना शासनाकडून दिल्या जात आहेत. तरीही मोबाईल परत घेतले जाणार नाहीत.

- एम. ए. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य.

म्हणून केला मोबाईल परत

काम वाढत गेल्याने मोबाईलची क्षमता कमी पडत गेल्याने मोठी अडचणी निर्माण झाली होती. मोबाईल दोन जीबी रॅमचा होता. त्या तुलनेत लाभार्थ्यांची माहिती खूप जास्त होती. यामुळे मोबाईल वेळोवेळी हँग होतात. अतिशय निकृष्ट दर्जाचे मोबाईल दिले होते. त्यांच्या दुरुस्तीचा खर्चही जास्त होता.